Advertisement

मागील २०२३ च्या खरीप व रब्बी पिक-विम्यासाठी शेतकऱ्याची कृषी अधिकारी कार्यालयावर धडक...

मागील २०२३ च्या खरीप व रब्बी पिक-विम्यासाठी शेतकऱ्याची कृषी अधिकारी कार्यालयावर धडक...!
जळगाव (जा.):- आज दिनांक २७/१२/२०२४ रोजी जळगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी एकत्रित येत तालुका कृषी अधिकारी कार्यालय जळगाव जामोद येथे पीक विम्याच्या मागणीसाठी धडक दिली.

त्यामध्ये २०२३ या मागील वर्षी जळगाव (जा.) तालुक्यामध्ये निसर्गाच्या लहरीपणामुळे सतत पाऊस पडल्याने आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे सोयाबीन-कापूस पिकाचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामध्ये पिकाचे नुकसान होऊन देखील अनेक शेतकरी पिक-विमा मिळण्यापासुन अजुनही वंचित आहेत.

पिकविम्या पासुन वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी पिक विमा मिळावा यासाठी अनेक वेळा रस्त्यावर उतरून आपल्या नुकसानीच्या भावना लोकशाही मार्गाने आंदोलनाच्या माध्यमातुन सरकारला व पिक-विमा कंपनीला सांगितल्या होत्या. परंतु आतापर्यंतही पिक विमा कंपनीने सोयाबीन-कापुस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा केलेला नाही.

तसेच मागील वर्षी रब्बी पिकाचे सुद्धा भयंकर नुकसान झाले होते. यामध्ये अनेक शेतकरी पिक विम्यासाठी पात्र असतांनी त्यांना पिक-विमा मिळाला नाही. परंतु पीक-विमा कंपनी प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या भुमिका घेत वेगवेगळे निकष काढुन शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करुन वेळ मारुन देत असल्याने शेतकरी मात्र त्रस्त होतांनी दिसत आहे.

खरंतर शेती मातीत राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या भावनेचा आदर करुन पिक विमा कंपनीने खरीप व रब्बीचा पिक-विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावा या मागणीसाठी युवा आंदोलक अक्षय पाटील व शेतकऱ्यांनी एकत्रित येत तालुका कृषी अधिकारी कार्यालावर धडक देवुन व (Aic) पिक-विमा कंपनीचे तालुका प्रतिनिधी वनारे यांच्याशी दीर्घकाळ चर्चा करून शेतकऱ्यांच्या भावना सांगितल्या.

त्यानंतर लगेचच सर्व शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय गाठले व तहसीलदार पवन पाटील यांच्याशी चर्चा केली त्यानंतर तहसीलदार पवन पाटील यांनी या आठवड्यामध्ये मी पिक विमा कंपनीच्या प्रतिनिधीची व तालुका कृषी अधिकारी यांची बैठक बोलावुन घेतो असे सांगितले.

याप्रसंगी तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments