Advertisement

व्यसनमुक्त महाराष्ट्रा करिता तरुणांनी नशेच्या आहारी न जाता चांगले संकल्प करून नव्यावर्षाचे स्वागत केले पाहिजे.;गुरुवर्य प्रकाश शिंदे यांचे प्रतिपादन....चंद्रभान झिने देऊळगाव राजा

व्यसनमुक्त महाराष्ट्रा करिता  तरुणांनी नशेच्या आहारी न जाता चांगले संकल्प करून नव्यावर्षाचे स्वागत केले पाहिजे.;गुरुवर्य प्रकाश शिंदे यांचे प्रतिपादन....
चंद्रभान झिने देऊळगाव राजा 
 नववर्षाच्या पूर्वसंध्येला अनेक संस्थांमार्फत विविध नाविन्यपूर्ण समाज उपयोगी उपक्रम केले जात असतात असाच एक उपक्रम सर्वात्मक महारुद्र परिवारा ट्रस्ट यांच्या  शेगाव शाखेच्यावतीने भक्तगण  नागरिकांसाठी दुग्धपान वाटप सेवे अंतर्गत भाविकांना दूध वाटप करून करण्यात आले. मठाधिपती गुरुवर्य श्री प्रकाश भाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला यावेळी
व्यसनमुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे…शराब पीना छोड दो, अपना जीवन मोड दो…नशे से दोस्ती, जीवन से मुक्ती… हम सबका है यही सपना, नशामुक्त हो महाराष्ट्र अपना… अशा घोषणा देत जनजागृतीच्या माध्यमातून व्यसनाधिनतेच्या विळख्यात अडकत चाललेल्या तरुणाईला निरोगी आरोग्याचा मार्ग दाखविण्याकरीता व्यसनमुक्त महाराष्ट्रा करिता  तरुणांनी नशेच्या आहारी न जाता चांगले संकल्प करून नव्यावर्षाचे स्वागत केले पाहिजेअसे प्रतिपादन गुरुवर्य प्रकाश दादा शिंदे यांनी शेगाव येथे केले आहे.
मठाधिपती गुरुवर्य श्री प्रकाश भाऊ शिंदे सर्वात्मक महारुद्र परिवार ट्रस्ट शेगाव शाखेच्या वतीने  सदर दुग्धपान वाटपाचा कार्यक्रम शेगाव येथे संपन्न झाला.

पुढे बोलतांना गुरुवर्य शिंदे म्हणाले पुढील काळात अशाच अनेक समाज उपयोगी उपक्रमांमार्फत जनसामान्यांचे सेवा आपण करावी,आज नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक तरुण मद्यधुंद होऊन व्यसनाच्या विळख्यात अडकतात. मद्यपान करून भरधाव वेगाने गाडी चालविल्यामुळे अनेक अपघात देखील होतात. नव्या वर्षाच्या सुरूवातीला असे कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दारू नको दूध घ्या हा  उपक्रम आवश्यक आहे. तरुणांनी नशेच्या आहारी न जाता चांगले संकल्प करून नव्यावर्षाचे स्वागत केले पाहिजे.    
 नववर्षाचे स्वागत करताना चांगले विचार आणि संकल्प मनात ठेवून प्रत्येकाने व्यसनमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न रंगवावे, याकरीता या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. देशाची युवापिढी निरोगी असेल तर देशाचा अधिक विकास होतो. आपल्या देशाला महासत्ता बनवायचे असेल तर तरुणांनी निरोगी असले
 पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.  
या प्रसंगी हजारो भक्तगण आणि नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आणि कौतुक देखील केले. या उपक्रमासाठी शेगाव शाखेचे राघव चिमणकर श्री भरत मिसाळ अभिषेक मानकर अभिषेक तायडे यांच्यासह सर्व सहकारी यांनी आयोजनची धुरा सांभाळली.

Post a Comment

0 Comments