Advertisement

चाळीस टापरी शिवारात विहिरीत पडलेल्या बिबट्याचा सुखरूप केले रेस्क्यूवन कर्मचाऱ्यांनी अतिजोखिमीचा रेस्क्यू केला यशस्वी

चाळीस टापरी शिवारात विहिरीत पडलेल्या बिबट्याचा सुखरूप केले रेस्क्यूवन कर्मचाऱ्यांनी अतिजोखिमीचा रेस्क्यू केला यशस्वी

जळगावचा प्रतिनिधी – 27 जानेवारी सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या चाळीस टापरी शिवारात एका पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत बिबट्या पडल्याची घटना 26 जानेवारी रोजी दुपारी उघडकीस आली होती. याची माहिती मिळाल्यानंतर बुलढाणा येथील वन विभागाच्या रेस्क्यू पथकाने घटनास्थळी दाखल होऊन इतरांच्या मदतीने या बिबट्याला फिजिकल रेस्क्यू करून पिंजऱ्याच्या साहाय्याने सुखरूप बाहेर काढून रात्री अंबाबारवा अभयारण्यात सोडून दिले आहे.


जळगांव जामोद तालुक्यातील चाळीस टापरी गावा जवळ 70 ते 80 फूट खोल दरीत असलेली विहिरीत मादी बिबट काल रविवारी पडल्याची बाब समोर आली होती.ही माहिती गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याची माहिती जळगाव जामोद वन विभागाला दिली असता वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी जाऊन पाहणी केली व बुलढाणा येथून वन विभागाच्या रेस्क्यू पथकाला पाचारण करण्यात आले. खोल दरीत पिंजरा नेणे आणि त्याला वर काढणे हे अति जोखीमाचे काम होते तरीही वन विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हे आवाहन स्वीकारत रेस्क्यू ऑपरेशन सुरू केला.बिबट्याला काढण्यासाठी विहिरीत पिंजरा सोडण्यात आला असता बिबट्या अलगद पिंजऱ्यात येऊन बसला. त्यानंतर दरीतून पिंजरा वर काढण्यात आला.जळगाव जामोदचे पशुधन विकास अधिकारी यांनी प्राथमिक तपासणी करून


बिबट्या सुदृढ असल्याचे सांगितल्यानंतर सदर बिबट्याला अंबाबारवा अभयारण्यातील आडनाला परिसरात रात्री निसर्ग मुक्त करण्यात आल्याची माहिती वनविभागाने आज 27 जानेवारीला दुपारी 12 वाजता दिली आहे.सदर कारवाई बुलढाणा डीएफओ सरोज गवस, एसीएफ अश्विनी आपेट यांच्या मार्गदर्शनाखाली जळगांव जामोदचे आरएफओ निलेश काळे, वनरक्षक सादिक सुरत्ने रेस्क्यू पथकातील संदीप मडावी, अमोल चव्हाण, पवन वाघ, अक्षय बोरसे व जळगाव जामोद वन कर्मचाऱ्यांनी यशस्वी केले.

Post a Comment

0 Comments