*कृषी विज्ञान केंद्रात विद्यार्थ्यांसाठी नवीन कायदेविषयक मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न...*
जळगाव जामोद प्रतिनिधी-
सातपुडा कँम्पस जळगाव जामोद येथे दिनांक १८ जानेवारी रोजी विद्यार्थ्यांना नवीन कायदे माहित व्हावे, तसेच नवीन कायदे आणि जुने कायदे यामधील बदल याबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री खारकर साहेब प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट जळगाव जामोद हे होते.तर प्रमुख उपस्थितीत जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीकांत निचळ पीएसआय शुद्धोधन नितनवरे,पीएसआय नागेश खाडे,पीएसआय कांबळे, पीएसआय झेंडगे, डॉक्टर संदीप वाकेकर , पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश पुंडे,पोलीस कॉन्स्टेबल सचिन राजपुत, पोलीस कॉन्स्टेबल समाधान शिंगणे यांची यावेळी उपस्थिती होती.यावेळी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री खारकर साहेब यांनी सांगितले की भारतीय न्याय संहितेत प्रथमच दहशतवादाची व्याख्या करण्यात आली असून तो दंडनीय गुन्हा करण्यात आला आहे.नवीन तरतुदींमध्ये सशस्त्र बंडखोरी, विध्वंसक कारवाया,फुटीरतावादी कारवाया किंवा भारताचे सार्वभौमत्व किंवा एकता आणि अखंडतेला धोका निर्माण करणारी कोणतीही कृती यांचा समावेश आहे. लहान संघटित गुन्ह्यांचे देखील गुन्हेगारीकरण केले गेले आहे, ज्यांना सात वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा आहे.भारतीय नागरीक सुरक्षा संहितेत ५३१ विभाग असतील (सीआरपीसीच्या ४८४ विभागांच्या जागी). विधेयकात एकूण १७७ तरतुदी बदलण्यात आल्या असून त्यात नऊ नवीन कलमे तसेच ३९ नवीन उपविभाग जोडण्यात आले आहेत. मसुद्यात ४४ नवीन तरतुदी आणि स्पष्टीकरणे जोडण्यात आली आहेत.३५ विभागांमध्ये टाइमलाइन जोडण्यात आली आहे आणि ३५ ठिकाणी ऑडिओ-व्हिडिओ तरतूद जोडण्यात आली आहे. संहितेत एकूण १४ कलमे रद्द करून काढण्यात आली आहेत.असे सखोल मार्गदर्शन त्यांनी भारतीय न्याय संहिता २०२३ बाबत अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.. यावेळी ठाणेदार श्रीकांत निचळ यांनी सांगितले १ जुलै पासून भारतीय न्याय संहिता लागू झाली असून या नवीन कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी आणि जनसामान्यांना व अंमलबजावणी यंत्रणेला कायद्याची ओळख करून देण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन केल्याचे ते बोलत होते.यावेळी सातपुडा कँम्पस येथील कृषी विज्ञान केंद्रातील ४०० पेक्षा जास्त विद्यार्थी व विद्यार्थिनी, प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
0 Comments