Advertisement

राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबीर समारोप

*राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबीर समारोप*
जळगाव जामोद प्रतिनिधी नागेश भटकर 
    
सातपुडा शिक्षण संस्था, जळगाव जामोद संचालित तथा डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय आणि उद्यानविद्या महाविद्यालय, जळगाव (जामोद) यांच्या संयुक्त विद्यमाने (Youth for My Bharat and Youth for Digital Literacy) या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचे आयोजन ग्राम-निमखेडी, चारबन व उमापूर येथे दि.29 डिसेंबर 2024 ते 4 जानेवारी 2025 पर्यंत करण्यात आले होते.

आज दिनांक 4 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रीय सेवा योजना श्रम संस्कार विशेष शिबिराचे समारोपीय कार्यक्रम पार पडला, सदर कार्यक्रमाला व्यासपीठावर अध्यक्षस्थानी सातपुडा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.कृष्णरावजी इंगळे होते तर सातपुडा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.हरिभाऊजी इंगळे उपस्थित होते, मडाखेड येथील सरपंच संघटनेचे अध्यक्ष आणि समाजसेवक मा.श्री.राजूभाऊ शित्रे पाटील, ग्राम उमापूर व चारबन ग्रामपंचायतीच्या सरपंचा सौ.सुलभाताई वाघमारे, श्री.अभयसिंह मारोडे, श्री.सचिन वारुळकर, श्री.उदय पटेल श्री.सुरेश बरेला यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.योगेश गवई, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.राहुल तायडे आणि राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.अविनाश आटोळे, डॉ.अनिकेत उमाळे, प्रा.दत्ता तायडे हे सुद्धा उपस्थित होते.

समारोपीय कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी गाडगे महाराज व डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली होती.

राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबीर समारोपीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.योगेश गवई यांनी केले, प्रास्ताविका दरम्यान मागील पाच दिवसांमध्ये विद्यार्थ्यांकडून शिबिरामध्ये राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. नंतर श्री.राजूभाऊ शित्रे आणि प्रा.हरिभाऊजी इंगळे यांनी त्यांच्या विद्यार्थी दशेतील प्रसंग कथन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते.

मा.श्री.कृष्णरावजी इंगळे यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व आणि विद्यार्थी दशेत असताना समाजाप्रती असलेले कर्तव्याची जाणीव करून दिली तसेच विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी करावी आणि प्रत्येक विद्यार्थ्याने एक चांगलं व्यक्तिमत्व घडवून स्वतः सोबतच आपल्या कुटुंबाचा, समाजाचा आणि आपल्या महाविद्यालयाचा सुद्धा उद्धार करावा याबाबत विचार व्यक्त केले.

सदर कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन डॉ.अनिकेत उमाळे यांनी केले यावेळी तीनही महाविद्यालयातील प्राध्यापक व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्याकरिता प्रा.प्रमोद डव्हळे, प्रा.कू.अनुराधा चोपडे, प्रा.कू.धनश्री इंगळे, प्रा.कु.अस्मिता कडू, प्रा.जिव्हेश साळी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments