पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर अगदी जगभरात, एकच नाद घुमावा – 'धनगरी रुद्रनाद'! ही केवळ ढोल-ताशांची लय नाही, ही आहे आपल्या इतिहासाची, आपल्या संस्कृतीची आणि आपल्या अस्मितेची जाणीव.
अहिल्यादेवींचं कार्य, त्यांचा त्याग, त्यांनी उभारलेली संस्कृती या साऱ्याला वंदन करण्यासाठी, त्यांच्या स्मृती जागवण्यासाठी आम्ही ढोल हाती घेतला आहे. काल रात्री ऋषी भैय्या टकले आणि आमच्या सहकाऱ्यांसोबत ढोल वाजवताना एक वेगळाच आत्मिक अनुभव मिळाला जो शब्दांच्याही पलिकडचा आहे. माझं सगळ्यांना मनापासून आवाहन आहे. आपण सगळ्यांनी आपल्या परीने 'धनगरी रुद्रनाद' ला हातभार लावूया. ढोल हाती घ्या, तालात ताल मिसळा, आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या ३०० व्या स्मृतीस अभिवादन करा. ही केवळ एक परंपरा नाही, ही आपली जबाबदारी आहे .आपल्या पुढच्या पिढ्यांना हा नाद, हा इतिहास, ही संस्कृती पोहोचवण्याची.
जय अहिल्या! जय मल्हार ! बिरोबाच्या नावानं चांगभल !
0 Comments