जळगाव जा/बुलडाणा
वादळी वाऱ्यासह पावसामुळे सूर्यफूल पिकाची तीन लक्ष रुपयाचे नुकसान,!
नैसर्गिक आपत्तींमुळे झालेली नुकसान भरपाई ची शेतकऱ्याची मागणी,!!
जळगाव जा तालुक्यातील वडशींगी येथील गजानन नामदेव फाळके यांनी तहसीलदार जळगाव जा व कृषी अधिकारी कार्यालय जळगाव जा यांना दिनाक 20/5/2025 रोजी निवेदन सादर केले निवेदनात त्यांची नावे बागायती शेती शेत शिवार मौजे उटी येथील गट नबर, 28 क्षेत्र ,1 हेक्टर,व गट नंबर 34 क्षेत्र 80 आर जमीन असून एकत्र दोन्ही गट लागून असून एकत्र शेती मद्ये संपूर्ण शेतात 1हेक्टर 80 आर शेती मद्ये फेब्रुवारी महिन्यात सूर्यफूल पिकाची पेरणी पूर्व खर्च पेरणी पासून खर्च व पीक हातात येण्या पर्यंतमोठ्या प्रमाणात पैसा खर्च करण्ययात आला परंतु वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे सूर्यफूल पिकाच नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे पीक जेमतेम कापनिवर आले असतानाच 19/5/2025 रोजी रात्री मोठ्या प्रमाणात
वादळी वाऱ्यासह पावसामुळे सूर्यफूल पिकाची किमान तीन लक्ष रुपयाचे नुकसान झाले आहे सूर्य फुल जमीनदोस्त व मातीमोल झाल्याने नासाडी होऊन शेतकऱ्याच्या तोंडाशी येणारा घास नैसर्गिक आपत्तींमुळे हिरवल्या गेला पीक नुकसनिमुळे शेतकऱ्याची आर्थिक स्थिती ठासल्ली असून निवेदनाद्वारे शासन स्तरावरून चौकशी समिती द्वारे पिकाची चौकशी करून प्रत्यक्ष घटनेचा पंचनामा करून नैसर्गिक आपत्तींमुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनाने तत्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी तहसीलदार कार्यालय जळगाव जा व कृषी अधिकारी कार्यालय जळगाव जा यांना दिलेल्या निवेदनातून मागणी केली आहे ,
अहिल्या न्यूज चॅनल करिता कार्यकारी संपादिका सौ सरला ताई राजेंद्र ससाणे ची बातमी
जळगाव जा,बुलडाणा
0 Comments