Advertisement

लोकांच्या हिताचे काम करणे हेच खरे समाजकारण आणि राजकारण - ऋषिकेश भरत चव्हाण

लोकांच्या हिताचे काम करणे हेच खरे समाजकारण आणि राजकारण - ऋषिकेश भरत चव्हाण

भिलदरी तांडा येथील सात नागरिकांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया

समता फाउंडेशन तर्फे व इंद्रायणी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ऋषिकेश भरत चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नाने लॉयन्स नेत्र रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे भिलदरी तांडा येथील सात नागरिकांची मोफत मोतीबिंदू निदान व शस्त्रक्रिया करण्यात आली.
यावेळी लोकांच्या हिताचे काम करणे हेच खरे समाजकारण आणि राजकारण आहे आणि जर लोकांना आपल्या समाजकार्यातून आणि राजकारणातून फायदा होत नसेल तर अश्या समाजकार्याची आणि राजकारणाची मला अजिबात गरज देखील नाही असे ऋषिकेश चव्हाण यांनी मत व्यक्त केले.

या मोफत मोतीबिंदू निदान व शस्त्रक्रिया पार पाडण्यासाठी ऋषिकेश चव्हाण यांना अन्वर भाई शेख,आडे साहेब,सागर चव्हाण,जितेंद्र चव्हाण यांची साथ लाभली.

Post a Comment

0 Comments