मोझरी जिल्हा अमरावती येथे माननीय बच्चुभाऊ कडू यांनी अन्य त्याग उपोषणासाठी बसलेले आहे.आज दुसरा दिवस असून सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दिशाभूल केल्यामुळे शेतकरी वर्ग फार संकटात जीवन जगत आहे. मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक पूर्वी शेतकऱ्यांना संपूर्ण सातबारा कोरा.. कोरा.. कोरा... दिव्यांगांचे मानधन प्रति महिना सहा हजार रुपये. मेंढपाळांना अनुदान.वयोवृद्ध व विधवा स्त्रियांना वाढीव मानधन. घरकुलांचे पाच लाख रुपये अनुदान. असे अनेक आश्वासने देऊन मुख्यमंत्री पदावर बसून एकही आश्वासन पूर्ण केले नाही. याकरिता सरकारला जाग आणून दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी प्रथम उद्देश
कर्जमाफीसाठी शेतकरी वर्ग आतुरतेने वाट पाहत असलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी बच्चुभाऊ कडू अन्न त्याग उपोषणाला बसलेले आहे.प्रहार संघटना व शेतकरी वर्ग सुद्धा संतापून तालुका चांदुर बाजार जिल्हा अमरावती येथील पूर्णा नदीवर असलेले विष्णोई धरणात जल समाधीसाठी उतरलेले आहे . त्यांच्या भेटीसाठी महाराष्ट्रातून शेतकरी वर्ग अनेक पक्षातील कार्यकर्ते समाज प्रबोधनकार श्री सत्यपाल महाराज तालुका मलकापूर प्रहार पक्षाचे कार्यकर्ते अजित फुंदे सह कार्यकर्ते बच्चुभाऊंच्या समर्थनासाठी भेट दिली. याकडे फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांना कोणती अपेक्षा पूर्ण होते. याकडे जनतेचे लक्ष वेधले आहे हे दिसून येईल.
गजानन बी.कवळे. जिल्हा प्रतिनिधी जळगाव खां
0 Comments