अतिरिक्त अर्थाकारण व धर्मामुळे लोकशाही धोक्यात
जळगांव (जामोद ) आर्थिक विकासामुळे जनतेचे जीवनमान सुधारते तर सलोख्यामुळे समाज एकसंघ राहून समाज विकासासाठी पोषक वातावरण निर्माण होते मात्र आजरोजी या दोन्ही घटकंचा स्वार्थासाठी गैरवापर होत आहे याला आपण वेळीच आवर न घातल्यास भारतीय लोकशाही धोक्यात येईल असे प्रतिपादन संविधान तज्ञ डॉ सुरेश माने यांनी केले आहे )जळगांव (जामोद )येथिल सांस्कृतिक भावनामध्ये भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवा निमित्ताने संविधान अधिकारी संमेलनाचे आयोजन दि 13 जून रोजी करण्यात आले होते त्यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ सुरेश माने बोलत होते. सर्व प्रथम शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले व डॉ आंबेडकर यांच्या प्रतिमंचे पूजन करून मान्यव रांचे हस्ते करण्यात येऊन पुष्पमाला अर्पण केल्यात. या वेळीप्रमुख पाहुणे राजाभाऊ कोकाटे, अरविंद कांबळे, सुभाष वानखडे इत्यादीनी भारतीय संविधानाबद्दल. मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे जिल्हाध्यक्षविनोद पवार, यांनी केले तर सूत्रसंचालन विजय इंगळे यांनी करून आभार सुजित बांगर यांनी मानले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीते साठी आंबेडकर शेख, मनोहर वाघ, अमित पहूरकर आदींनी परिश्रम घेतलेत तसेच या प्रसंगी काही लोकांनी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षात प्रवेश सुद्धा घेतला
0 Comments