*समाजाभिमुख संशोधन प्रकल्प विद्यार्थ्यांनी,करावेत:प्रा.डाॅ.अजितकुमार जाधव !यशवंतराव चव्हाण महिविद्यालय इसलामपूर येथे विद्यार्थी कार्यशाला*
*इसलामपूर दि (प्रतिनिधी)* *इकबाल पीरज़ादे*
वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटीचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय इतिहास विभाग व अग्रणी महाविद्यालय उपक्रमाअंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी *संशोधन प्रकल्प कसा लिहावा* या विषयावरील एक दिवसीय ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
प्रमुख व्याख्याते म्हणुन सातारा जिल्ह्यातील नागठाणे येथील आर्टस् व कॉमर्स कॉलेजचे इतिहास विभाग प्रमुख डाॅ. अजितकुमार जाधव यांचे ऑनलाईन मार्गदर्शन लाभले.
प्रास्ताविक व स्वागत करताना कार्यशाळेच्या समन्वयक इतिहास विभाग प्रमुख प्रोफेसर डाॅ.सौ.कल्पना मोहिते म्हणाल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षात बरेच कार्यक्रम आँनलाईन पध्दतीने झाले.नुकतीच महाविद्यालये सुरु झालीत . महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांच्यात संशोधन वृत्ती निर्माण व्हावी या उद्देशाने विद्यार्थ्यांना पदवीच्या अंतिम वर्षात अभ्यासक्रमात अंतर्गत मूल्यमापन परीक्षेसाठी संशोधन प्रकल्प आवश्यक विषय आहे ,हे प्रकल्प संशोधनात्मक पध्दतीने कसे लिहावे याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना व्हावे या उद्देशाने आम्ही आज या कार्यशाळेचे आयोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यशाळेसाठी वाळवा व शिराळा तालुक्यातील अग्रणी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना व इतर विद्यार्थ्यांनाही आँफलाईन व ऑनलाईन अशा दोन्ही माध्यमातुन आमंत्रित करण्यात आले होते.
मार्गदर्शनपर भाषणात प्रमुख पाहुणे मा.डाॅ.अजितकुमार जाधव सर म्हणाले, विद्यार्थ्यांना संशोधन प्रकल्प हा अभ्यासक्रमातील आवश्यक विषय आहे मात्र प्रकल्प लिहायचा कसा किंवा प्रकल्पासाठी विषय निवडायचा कसा ,विषय निवडताना समाजासाठी त्याचा उपयोग कसा होईल असेच विषय विद्यार्थ्यांनी निवडावे.आपला प्रकल्प समाजासाठी उपयुक्त ठरावा असे प्रकल्प विद्यार्थ्यांनी करणे गरजेचे आहे. संशोधनाच्या पायर्या काय आहेत ते करत असताना कोणती दक्षता घ्यावी म्हणजे आपले श्रम आणि वेळ वाया जाणार नाही याचे सखोल मार्गदर्शन डाॅ.अजितकुमार जाधव सर यांनी केले.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्राचार्य डाॅ.ए.एम.जाधव सर म्हणाले " प्रकल्पासाठी विषय निवड करण्यापासून ते उच्च्च शिक्षणापर्यत संशोधन कसे करावे हे सर्व शास्त्रशुध्द ज्ञान डाॅ.अजित जाधव सरांच्या मार्गदर्शनामुळे आजच्या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना झाले व त्याचा नक्कीच उपयोग विद्यार्थ्यांना होऊन संशोधन वृत्ती निर्माण होईल.व भविष्यात मोठे संशोधक तयार होण्यास मदत होईल.
पाहुण्यांची ओळख प्रा.एस.व्ही सुतार यांनी करुन दिली.आभार अग्रणी महाविद्यालय उपक्रम समन्वयक डॉ .बी .पी. पाटील यांनी मानले . सूत्रसंचालन प्रा एस वाय यमगर यांनी केले .कार्यशाळेचे संयोजन व यशस्वितेसाठी समन्वयक प्रा.डाँ.सौ.कल्पना मोहिते प्रा.सुतार प्रा.यमगर श्री.मयुर आसिफ,दळवी, विशाल यांनी परिश्रम घेतले. कार्यशाळेसाठी अग्रणी महाविद्यालयातील व इतर महाविद्यालयातील प्राध्यापक बंधुभगिनी विद्यार्थी विद्यार्थिनी 200 पेक्षा जास्त संख्येने आँनलाईन व आँफलाईन माध्यमातुन उपस्थित होते.
0 Comments