Advertisement

महाराष्ट्रातील २७ हजार ९२० ग्रामपंचायत चे ६० हजार कर्मचारी दि ९ मार्च २०२२ ला निर्धार मोर्चा घेऊन धडकणार मंत्रालयावर

महाराष्ट्रातील २७ हजार ९२० ग्रामपंचायत चे ६० हजार कर्मचारी दि ९ मार्च २०२२ ला निर्धार मोर्चा घेऊन धडकणार मंत्रालयावर (तालुका प्रतिनिधी रियाज शेख)
महाराष्ट्र तील सर्व ग्रामपंचायत चे कर्मचारी यांना महाराष्ट्र शासनाने दिनांक १० आगष्ट २०२० रोजी किमान वेतन मंजूर केले आहे परंतू . किमान वेतन लागू करून दिड वर्ष पूर्ण होऊन सूद्धा मागील किमान वेतनाची फरकाच्या रकमेची तरतूद केली नाही अनेक वेळा निवेदने, पाठपुरावा करून सूद्धा शासनाकडून फक्त आश्र्वासन दिले गेले परंतू पाळण्यात आले नाही . त्यामुळे सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या मध्ये असंतोष निर्माण झाला आहे  त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी राज्य कार्यकारिणी यांनी घेतलेल्या कर्मचारी यांच्या असंतोषामूळे दिनांक ९ मार्च २०२२ रोजी मूंबई येथे निर्धार मोर्चा आयोजित केला आहे  या मोर्चात बूलडाणा जिल्ह्यातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत बूलडाणा जिल्ह्यातील सर्व कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने मोर्चा सहभागी व्हावे असे आवाहन बूलडाणा जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियन ४५११ चे जिल्हा अध्यक्ष यशवंत इंगळे जिल्हा सचिव भरत सूपेकर, जिल्हा उपाध्यक्ष दिलिप बोरे, प्रमोद पिसे, राज्य संघटक या रामेश्वर गायकी राज्य सदस्य सूरेश सपकाळ व किसन अवसरमोल ता  अध्यक्ष, सिंदखेडराजा कलिम पठाण ता संघटक यांनी केले आहे

Post a Comment

0 Comments