सातपुडा शिक्षण संस्था जळगांव जामोद द्वारा संचालित व डॉ० पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित
स्वा. वि. ग. इं. कृषि व उद्यानविद्या महाविद्यालय, तसेच कृषी अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय, जळगाव जामोद, जि.बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित...
*राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रम संस्कार शिबीर*
ग्राम चावरा-इलोरा येथे यशस्वीपणे पार पडले.
*मोफत आरोग्य निदान करून शिबिराचे समारोप*
श्रम संस्कार शिबिराच्या शेवटच्या दिवशी जळगाव जामोद येथील वैद्यकिय तज्ञ् मंडळी डॉ० संदीप (बालरोगतज्ञ), संचालक स्पंदन हॉस्पिटल तथा सातपुडा शिक्षण संस्था, डॉ० राम भोपळे (दंत चिकित्सक), डॉ० राजेश वाकोडे (जनरल फिजिशियन्) यांनी ग्राम चावरा इलोरा येथील रुग्णांची मोफत तपासणी व् निदान केले, या आरोग्य शिबिरास् एकूण 67 रुग्णास सेवा देण्यात आली. पाच दिवसीय् या श्रम संस्कार शिबिरच्या समारोपिय् कार्यक्रमास् प्रमुख वक्ते तथा मार्गदर्शक म्हणून जळगांव जामोद पोलीस स्टेशनचे कर्तव्यनिष्ठ ठाणेदार श्री. सुनील अंबुलकर यांनी कार्यक्रमाची शोभा वाढविली, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ०.संदीप वाकेकर्, संचालक सातपुडा शिक्षण संस्था, तर प्रमुख् उपस्थिती श्री राजेश सित्रे पाटील, अध्यक्ष, सरपंच संघटना जळगाव जामोद तथा सरपंच मडाखेड खु., डॉ० राजेश वाकोडे, श्री सचिन वारुळकर्, पोलिस् पाटील श्री गोविंदा लोधे, ग्राम पंचायत सदस्य विजुभाऊ तिजारे, ज्ञानेश्वर तिजारे, श्री भानुदास भटकर, महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. योगेश गवई हे उपस्थित होते.
यावेळी बोलतांना ठाणेदार साहेब म्हणाले, कि हे तुम्ही तुमचं भाग्य सांजा कि तुम्ही या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहात, ज्या भागामध्ये अशा प्रकरच्या शैक्षणिक संस्था कार्यरत असतील तो भाग कोणत्याही दृष्टिकोनातून अविकसित् राहू शकत नाही, आपण ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रात अव्वल स्थान गाठायचा आहे, आपला ठसा उमटला पाहिजे असे कार्य आपण केले पाहिजे. आपल्याला आपल्या कार्याची आपल्या क्षेत्रात नशा चढली पाहिजे. मोठी स्वप्ने उराशी बाळगून त्यांना सुरुवातीला त्रास होतो पण नंतरचा आयुष्य मात्र आपलं सुखात जातो, याप्रमाणेच आपण ठरवलेले ध्येय गाठताना सुरुवातीला आपल्याला त्रास होतो म्हणून आपण मोठी स्वप्न पाहायचं सोडून छोटी स्वप्न पाहायची का? तर नाही. तुम्ही ज्याही क्षेत्रात जाल तिथे सुरुवातीला तुम्हाला त्रास होणारच. आपल्याला कोणी दगड जरी संबोधले तरी आपण नारळ फोडायचा दगड न बनता आपल्याला मूर्तीचा दगड बनायचं आहे, मूर्ती घडवताना सुरुवातीला त्रास जरी झाला तरी आयुष्यभर मात्र त्या मंदिरात येणारे सर्व आपल्या समोर नतमस्तक होतील, परंतु त्रास होऊ नये म्हणून जर आपल्या मूर्ती घडू द्यायची नसेल तर आयुष्यभर आपल्यावर नारळ फोडल्याने त्रास होणार आहे हे मात्र निश्चित.
पौगंडावस्थेत असताना आपण मनाच्या तीनही अवस्थेबद्दल विचार केला पाहिजे त्या म्हणजे इद, ईगो आणि सुपरईगो, (Id, ego and superego). यात आपल्या इगो ला आपला सुपर इगो सतत कंट्रोल करत राहतो या अवस्थेमध्ये जाताना आपला जर स्वाभिमान दुखावला गेला म्हणजे इगो हर्ट झाला असं म्हणतो तेव्हा सुपर इगो आपल्याला म्हणतो ठीक आहे काही नाही असं होत राहते आपण पुढच्या वेळेस व्यवस्थित करू होईल सगळं ठीक अशाप्रकारे आपण स्वतःला सिद्ध केले पाहिजे, म्हणजेच आपल्या इगोला सुपरइगोवर हावी होऊ द्यायचं नाही.
डॉ०. संदीपजी वाकेकर् यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून उपस्थित रा.से.यो.च्या स्वयंसेवकांना त्यांच्या शिस्त व् स्वछते करिता उत्कृष्ठ असे मार्गदर्शन केले. सातपुडा शिक्षण सन्स्थेच्या वतीने आभार मानले.
या कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी, प्रा.अविनाश आटोळे, प्रा.तुळशीराम राठोड, प्रा.राहुल तायडे, प्रा. प्रमोद डव्हळे, प्रा. जिव्हेश् साळी, प्रा. स्नेहल बायस्कर्, प्रा.वैभव हागे, प्रा.हरिदास वाशीमकर, यांनी परिश्रम घेतले.
0 Comments