Advertisement

धनगर समाजावर अन्याय झाला तर कुठल्याच राजकीय नेत्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही- नंदू भाऊ लवंगे

 *धनगर समाजावर अन्याय झाला तर कुठल्याच राजकीय नेत्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही- नंदू भाऊ लवंगे


*

 दि.२/५/२०२२ रोजी बुलढाणा स्थानिक विश्रामगृहात ऑल इंडिया मल्हार नवयुवक सेनेची राज्यव्यापी बैठक पार पडली.यावेळी या राज्यव्यापी बैठकीचे अध्यक्ष नंदु भाऊ लवंगे प्रदेशाध्यक्ष ऑल इंडिया मल्हार नवयुवक सेना , तसेच प्रमुख अतिथी महिला प्रदेशाध्यक्ष शारदाताई पांढरे , व कैलास अवघड प्रदेशसचिव , रामभाऊ जुमडे बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख ,प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी नंदूभाऊ लवंगे समाजाच्या प्रश्नावर आक्रमक झाले होते. धनगर समाजाच्या कुठल्याही व्यक्तीवर अन्याय झाला तर कुठल्याच राजकीय नेत्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही.असा पवित्रा नंदू भाऊ लवंगे यांनी घेतला, त्याच बरोबर ऑल इंडिया नवयुवक मल्हार सेनेच्या  महिला प्रदेशाध्यक्ष शारदा ताई पांढरे यांनी समाजाने एकजुट रहावे असे आवाहन केले, आणि धनगर समाजाच्या सेवेसाठी मी २४ तास तप्तर राहील अशी ग्वाही शारदाताई पांढरे यांनी दिली.तसेच कैलास अवघड आणि रामभाऊ जुमडे यांनी बैठकीमध्ये आपली भूमिका मांडली यावेळी या राज्यव्यापी बैठकीला असंख्य समाज बांधव उपस्थित होते. यावेळी सुनिल भाऊ नेमाडे विदर्भ उपाध्यक्ष ऑल इंडिया मल्हार नवयुवक सेना, राज फासे सर , ॲड. रामेश्वर शेवाळे सर , अतुल  गोरे, सचिन सपकाळ, अतुल लोणाग्रे , प्रविण गायकवाड, गजानन सपकाळ,दिपक कळंगे, अंबादास माने, नंदकिशोर काळिंगे,अरुण वैतकार, गजानन लाखे,विजय जुमळे , शिवाजी देव्हळे, सोनाजी पिसाळ, कृष्णा नरोटे, सुभाष नरोटे , रमेश  तेटे, अनिल स्वर, मंगेश जावळे, समाधान नरोटे, गणेश नपते, अमोल गांधीले , रामेश्वर नपते , किशोर जावळेकर व असंख्य समाज बांधव हजर होते

Post a Comment

0 Comments