Advertisement

महासिद्ध अर्बनने जनतेचा विश्वास सार्थ ठरविला... -आ.डॉ.राजेंद्रजी शिंगणे* 2 ​ 3 *गरजू व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी महासिद्ध पतसंस्थेने बळ दिले -मा.आ.कृष्णरावजी इंगळे* विशेष जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा: नागेश भटकर

*महासिद्ध अर्बनने जनतेचा विश्वास सार्थ ठरविला... -आ.डॉ.राजेंद्रजी शिंगणे* *गरजू व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी महासिद्ध पतसंस्थेने बळ दिले -मा.आ.कृष्णरावजी इंगळे* प्रतिनिधी : नागेश भटकर - सहकार क्षेत्रात जनतेचा विश्वास संपादन करून अनेक गरजू गोरगरीब व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासठी महासिद्ध पतसंस्थेने बळ दिले आहे. सहकार क्षेत्र सांभाळताना हा काटेरी मुकुट आहे. प्रत्येकाला आपण यामधून समाधानी ठेवू शकत नाही, पण अडचण असलेल्या व्यक्तींना यातून मदत होते. असे मत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.आ.कृष्णरावजी इंगळे यांनी व्यक्त केले. महासिध्द अर्बन क्रेडिट को. ऑप. सोसायटी या नामांकित पतसंस्थेच्या नवव्या शाखेचा सोमवार ९ जुलै रोजी उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटक माजी मंत्री आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या शुभहस्ते या शाखेचा उद्घाटन सोहळा थाटात पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माननीय ज्ञानेश्वरदादा पाटील पक्षनेते खामगाव, मा.साहेबरावजी कलोरे मा.नगराध्यक्ष, जेष्ठ नेते मा.प्रकाशबापू देशमुख, मा.सभापती दयारामजी वानखडे, माजी जि.प.उपाध्यक्ष पांडुरंगदादा पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अविनाश दळवी, मा.नगराध्यक्ष अभयसिंह मोहता, मा.शहराध्यक्ष बुडू जमादार, मा.गोपाल कलोरे, मा.नगराध्यक्ष शैलेंद्र पाटील, पी.एम.घाटोळ, रमेश काशेलानी, अविनाश अकोटकर, नवनीत चांडक, शहराध्यक्ष किरणबापू देशमुख, मांगीलाल भंसाली, विजय काटोले महासिद्ध अर्बन शाखाध्यक्ष सतीश चौधरी आदींची मंचकावर उपस्थिती होती. यावेळी उद्घाटनीय भाषणात मा.मंत्री डॉ.राजेंद्रजी शिंगणे यांनी मत व्यक्त करताना म्हटले की महासिद्ध परिवाराने जनतेचा विश्वास सार्थ ठरविला. हे फार मोठ काम प्रत्येकाच्या नशिबाला येत नाही. याच विश्वासाच्या जोरावर महासिद्ध परिवार प्रगती पथावर आहे, याचे सर्व श्रेय कृष्णरावजी इंगळे यांच्यासह सर्व सहकारी यांना जाते असे मत आ.डॉ शिंगणे यांनी केले. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संस्थेच्या अध्यक्षा मा.डॉ.सौ.स्वाती वाकेकर यांनी केले. स्वातीताईंनी संस्थेच्या कार्याचा लेखाजोखा जनतेसमोर ठेवला २१ जून १९९१ पासून महासिद्ध अर्बन संस्था जणसेवेत रुजू झाली. ३२ वर्षाच्या कार्यप्रणालीत संचालक मंडळाच्या माध्यमातून सातत्याने जनतेला सेवा देण्यावर भरदिला त्या बळावर जिल्ह्यात विविध ठिकाणी ९ शाखा सुरू झाल्या. शेतकरी शेतमजूर यांच्या विश्वास छोट्या व्यवसायीकांचा विश्वास सार्थ ठरवून महासिध्द अर्बंनची ठेव ८६ कोटी पर्यंत पोहचली. सातत्याने पारदर्शी ऑडिट झाल्याने संस्थेला (अ) दर्जा प्राप्त झाला. २०१० पासून आतापर्यंत ६१ कोटींचे कर्ज वाटप संस्थेने केले. यामध्ये विविध क्षेत्रातील कर्ज वाटपाच्या माध्यमातून संस्थेचे नावलौकीक झाले. केवळ नफा मिळवणे हा सस्थेचा उद्देश नसून महासिध्द अर्बन संस्थेने समाज उपयोगी उपक्रम राबवून नावलौकिक प्राप्त केल्याचे मत त्यांनी बोलताना व्यक्त केले. तसेच यावेळी ज्ञानेश्वरदादा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले व शेगवात लवकरच महासिद्ध अर्बन आपला ठसा उमटवेल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.किरणबापू देशमुख यांनी केले तर आभार प्रवीण भोपळे यांनी केले. यावेळी शहर व ग्रामीण परिसरातील नागरीक तसेच सामाजिक संस्था, सहकारी संस्थेचे प्रमुख, पत्रकार, व्यावसायिक तथा महिलांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments