Advertisement

समाज परिवर्तन प्रबोधन आणि समाजामध्ये क्रांतीकारक बदल घडविण्याचे कार्य शिबिरातून होते !..... जगदीश गवई* नागेश भटकर विशेष जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा

*समाज परिवर्तन प्रबोधन आणि समाजामध्ये क्रांतीकारक बदल घडविण्याचे कार्य शिबिरातून होते !..... जगदीश गवई* नागेश भटकर विशेष जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा जळगाव जामोद येथे भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेच्या वतीने मागील 45 वर्षापासून विविध प्रकारचे शिबिरे राबविण्यात येतात समाज परिवर्तन प्रबोधन आणि समाजामध्ये क्रांतिकारक बदल घडविण्याचे कार्य ह्या शिबिरातूनच होते असे स्पष्ट प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जगदीश गवई साहेब यांनी केले ते भारतीय बौद्ध महासभा बुलढाणा जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित चिंतन शिबिराचे उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते त्याकरिता निधी उभारण्यासाठी संस्थेचे सभासद क्रियाशील सभासद व आजीवन सभासद होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले प्रथमतः कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व तथागत भगवान बुद्ध व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला माल्यार्पणाने झाली भगवान बुद्धांनी आत्म्याचा सिद्धांत नाकारला एवढेच नाही तर मानवी शरीर हे पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या पाच घटकांपासून बनलेले नसून ते पृथ्वी, आप, तेज आणि वायू या चार घटकांपासून बनलेले आहे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध करून दाखवीले आणि म्हणून जगाने भगवान बुद्धांचे तत्त्वज्ञान मान्य केले नव्हे तर जगाने एक थोर शास्त्रज्ञ म्हणून स्वीकारले आदर्श पुरुष व आदर्श समाज बुद्ध तत्त्वज्ञानामुळेच बनू शकतो असेही त्यांनी सांगितले अमरावती विभाग सचिव सुरेश पवार यांनी आठ गोल्डन मार्ग व जळगाव खान्देश विभागीय सचिव डॉ. अनिल वानखडे यांनी पदाधिकाऱ्यांची आचारसंहिता या विषयावर मार्गदर्शन केले रामकृष्ण रजाने व भीमराव तायडे यांनी या चिंतन बैठकीस शुभेच्छा दिल्या जिल्हा अध्यक्ष एस. एस. वले सर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या चिंतन शिबिराचे संचालन जिल्हा कोषाध्यक्ष के.के .शेगोकार व आभार प्रदर्शन तालुका अध्यक्ष जगदीश हातेकर यांनी केले जळगाव जामोद, नांदुरा, संग्रामपूर, खामगाव, शेगाव इत्यादी तालुक्यातील पदाधिकारी या चिंतन बैठकीला उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सुभाष शिरसाट, भास्कर जुंबळे, आनंद लहासे, अनिल इंगळे, विजय वाकोडे, विलास सोनोने, आकाश हातेकर, परमेश्वर पारवे ,विठ्ठल तायडे, सुभाष शेगोकार, तानाजी गवई, महेंद्र जाधव, वंदनाताई भगत, सुरेंद्र आठवले, देवानंद आठवले ,यांनी अथक प्रयत्न केले*

Post a Comment

0 Comments