Advertisement

*ढगफुटी सदृश्य पावसामुळे नुकसान झालेल्यांना सर्वे करून आर्थिक मदत तात्काळ देण्याची ठाकरे शिवसेनेची मागणी...*

*
जळगाव जामोद तालुक्यामध्ये दिनांक 22 जुलै रोजी ढगफुटी सदृश्य पावसामुळे तालुक्यासह जळगाव जामोद शहरांमध्ये थैमान घातले त्यामुळे भयंकर पूरस्थिती निर्माण होवुन नागरिकांची घरे पाण्याखाली गेली होती, त्यातच जळगाव जामोद शहरातील पद्मावती नदीच्या काठी घरांचे व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अद्यापही शासनाकडून पाहिजे त्या प्रमाणात पंचनामे झालेला नाही तसेच अद्यापही प्रशासनाकडून पाहिजे त्या प्रमाणामध्ये नुकसानग्रस्तांचे पंचनामा झालेले नाहीत तसेच नुकसानग्रस्त भागातील नागरिकांना अन्नधान्याची किंवा आर्थिक मदत पोहचली नाही.ज्या नागरिकांची जनावरे, वाहने तसेच जिवनावश्यक वस्तू पुरात वाहुन गेल्याने आजपर्यंत ही नुकसानीचे सर्वे करण्यात आले नाहीत.तसेच तालुक्यातील गोराडा धरणाचा काही भाग पाण्याने वाहुन गेला.गोराडा धरण पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांनी धरणाची योग्य ती काळजी न घेतल्याने त्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई ची मागणी यावेळी शिवसेनेने केली आहे.तसेच नागरीकांच्या नुकसानीचे दोन दिवसाचे आत सर्वे होऊन मदत जाहीर न केल्यास शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीने दिनांक 26 जुलै रोजी नुकसानग्रस्त शेतकरी,पुराने घराचे नुकसान झालेल्या नागरीकांचा महामोर्चा काढण्यात येईल असा इशाराच दिनांक 24 जुलै रोजी निवेदन देतेवेळी शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.निवेदन देतेवेळी जिल्हा सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील, उपजिल्हाप्रमुख तुकाराम काळपांडे,अल्पसंख्याक जिल्हाप्रमुख मुस्ताक भाईजान,युवासेना जिल्हाप्रमुख शुभम पाटील, विधानसभा संघटक भिमराव पाटील, तालुकाप्रमुख गजानन वाघ,शहरप्रमुख रमेश ताडे,जाकिर खान,चॉद कुरेशी,तुषार पाटील, ईश्वर वाघ,संतोष डब्बे, कैलास राजपुत, अशोक टावरी,नरेंद्र काळे,सुभाष माने,शांताराम धोटे,इरफान पठाण,गजानन मांडेकर, कैलास वंडाळे,गणेश धुळे,मंगेश कतोरे यांच्यासह बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते.*

Post a Comment

0 Comments