Advertisement

पालकमंत्री गुलाबराव पाटील हरविल्याची शिवसेना उद्धव ठाकरे गटाची तक्रार... जिल्ह्यात पालकमंत्री दाखवून द्या अकराशे रुपयाचे बक्षीस...* जळगांव जा. प्रतिनिधी:-

*पालकमंत्री गुलाबराव पाटील हरविल्याची शिवसेना उद्धव ठाकरे गटाची तक्रार... जिल्ह्यात पालकमंत्री दाखवून द्या अकराशे रुपयाचे बक्षीस...* जळगांव जा. प्रतिनिधी:- जळगाव जामोद तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला असून जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव, जामोद जळगाव शहर आसलगाव, वडशिंगी, मडाखेड यासह इतरही नदीकाठील गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकासह शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले व येथील नागरिकांच्या घरांचेही मोठे नुकसान झाले, तसेच जनावरे वाहून गेली, काही जनावरे मृत्युमुखी पडली ढगफुटी सदृश्य होऊन आज तीन दिवस झाले तरी मुख्यमंत्री शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील एकही मंत्री किंवा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील जिल्ह्यात आले नाही.. किंवा झालेल्या नुकसानीचा आढावाही घेतला नाही म्हणून जळगाव जामोद ठाकरे शिवसेनेच्या वतीने जळगाव जामोद पोलीस स्टेशन गाठत बुलढाणा जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील हरविल्याची तक्रार देण्यात आली आहे तसेच पालकमंत्री दाखवून द्या व 1100 रुपये बक्षीस मिळवा असेही ठाकरे शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख गजानन वाघ यांनी जाहीर केले आहे..*

Post a Comment

0 Comments