अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झालेल्या तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन..

22 जुलै रोजी जळगांव जामोद व संग्रामपूर तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाने कहर, केल्याने नदी नाल्यांना महापुर आला,यामुळे हजारों एकर जमीन पिकांसह खरडुन गेल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आले आहेत.तर अनेक गावांत घरांचे नुकसान झाले आहे.कित्येकांचे कुटुंब उघड्यावर पडले, संसार उद्धवस्त झाले.गुरेढोरे वाहुन गेली,शेती खरडुन गेली, रडायला तर डोळ्यांत अश्रू सुध्दा उरले नाहीत,अशी अवस्था नागरिकांची झाली ज्याच्या घरात पाणी घुसले यांचे काही साहीत्य वाहुन गेले, त्यांना शासनाने युद्ध पातळीवर तात्काळ आपत्ती व्यवस्थापन योजनेतून मदत करायला हवी व पंचनामा करत बसल्यापेक्षा सरसकट पंचनामा करण्याचे आदेश द्यावे अशा संबंधित निवेदन उपविभागीय अधिकारी यांना जळगांव जामोद तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने देण्यात आले, याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा जळगांव जामोद मतदार संघाच्या पक्षनेत्या डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर,माजी जि.प.अध्यक्ष प्रकाश पाटील, महीला काँग्रेसच्या सौ.ज्योतीताई ढोकणे, तालुकाध्यक्ष अविनाश उमरकर, शहराध्यक्ष अर्जुन घोलप, जिल्हा सरचिटणीस अमर पाचपोर,ओ.बी.सी.सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष समाधान दामधर, नगरसेवक श्रीकृष्ण केदार, संदिप मानकर,कलीम मिस्त्री, युवक कॉंग्रेसचे जिल्हा सचिव जुनेद शेख,ओ.बी.सी.सेलचे शहराध्यक्ष एजाज शहा,पंचायत समिती सदस्य विनोद धंदर, रामकृष्ण धुळे,अकील शहा,अनिल इंगळे, मंगेश जामोदे व तालुक्यातील व शहरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते..!!!
0 Comments