*डॉ. सौ.स्वातीताइ वाकेकर दुसऱ्या दिवशी सुद्धा दौऱ्यावर..*. प्रतिनिधी नागेश भटकर

"पहिल्या दिवशी शहर तर दुसऱ्या दिवशी ग्रामिण भागाचा दौरा.
तर आज सुद्धा ग्रामिण भागांना भेट देणार..."
अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झालेल्या भागाची महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा जळगांव जा मतदार संघाच्या पक्षनेत्या डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर, तालुकाध्यक्ष अविनाश उमरकर यांनी केली पाहणी...
दि.22 जुलै रोजी जळगांव जामोद तालुका व संग्रामपूर तालुका येथे मुसळधार पावसाचा कहर, त्यामुळे नदी नाल्यांना आला महापूर यांनी
पाणी शिरल्याने जनजिवन विस्कळीत झाले हजारो एकर जमीन पिकांसह खरडुन गेल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आले.
शेतकरी शेतमजुरांना मुसळधार पावसाचा फटका शेतपिकाच्या नुकसानसह मोठ्या प्रमाणात घराची पडझड सुद्धा झाली. त्याचबरोबर गुराढोरांच्या चाऱ्याचे व गुराढोरांच्या गोठ्याचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले
लोकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे घरातील सर्व सामानाचे व धान्याचे सुद्धा नुकसान झाले काही घरे जमीनदस्त तर काही घरांची प्रचंड प्रमाणात पडझड झाली.
काही ठिकाणी जनावरे व शेती साहित्य नदीच्या पुरात वाहून गेले.
सरकारने कोणत्याही प्रकारचे निकष न लावता सरसकट नुकसानग्रस्त शेतकरी, शेतमजुरांना यांना आर्थिक मदत देण्यात यावी. याप्रसंगी जळगांव जामोद शहर व तालुक्यातील उटी बु ,उटी खुर्द, वंडशिगी, येनगाव, मडाखेड खुर्द, मडाखेड बु, चावरा, ईलोरा आदी गावांमध्ये जाऊन अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झालेल्या भागाची महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा जळगांव जामोद मतदार संघाच्या पक्षनेत्या डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर व तालुकाध्यक्ष श्री.अविनाशभाऊ उमरकर यांनी भेट देऊन पाहणी केली...
0 Comments