
*जळगाव जामोद येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचा सर्व्हे करुन तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली*
प्रतिनिधी नागेश भटकर
23 जुलै रोजी एका निवेदनाद्वारे तहसीलदार जळगाव जामोद केली. 22/7/23 जळगाव जामोद तालुक्यामधील तसेच शहरांमध्ये पावसाने कहर केला आहे. जिल्हयातील महसुली २० मंडळात अतिवृष्टी झाली. जळगाव जामोद तालुक्यात शनिवारी सकाळी सहा ते अकरा वाजेदरम्यान २८३ मिमी पाऊस पडला. त्यामुळे घरांचे, शेतीचे प्रचंड नुकसान झाले. शेती साहित्य वाहून गेले.
शहरातून पूर आल्याने नदी काठावरील अनेक घरे उध्वस्त झाली.यामध्ये जळगाव शहर मधील तलावपुरा ,खेडावेस, जवळील नगर वायलीवेस राणीपार्क,न्यामतपुर,येथल नागरिक पुरात अडकून पडले होते. तसेच जळगाव जामोद तालुक्यातसुध्दा सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यांमध्येही मुसळधार पाऊस बरसला. नदी- नाल्यांना पूर आल्याने हजारो हेक्टरवरील शेती खरडली. पिकांची अतोनात हानी झाली. अनेक जनावरे दगावली. जळगाव जामोद तालुक्यातील अनेक गावांमधील या शेतकऱ्याचा पुरात वाहून गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. कधी नव्हे इतका पाऊस या भागात पडला. रस्ते, पुलांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता. जळगाव जामोद - नांदुरा, जामोद- अकोट, जळगाव-बऱ्हाणपूर, खेर्डा- जामोद, टूनकी वरवट बकाल, वानखेड-, संग्रामपूर- वरवट बकाल हे मार्ग बंद होते. कित्येक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला होता. पावसामुळे शेतकरी, नागरिकांचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानाचा सर्व्हे करुन तत्काळ मदत देण्याची मागणी निवेदनाद्वारे एडवोकेट मोहसीन खान. महादेव भालतडक शेख जावेद तसेच गावातील नागरिक यांनी केली आहे.*
0 Comments