*दिव्यांगाचे कैवारी: मा. ना. श्री बच्चू भाऊ कडू उर्फ (ओमप्रकाश बाबाराव कडू)*

दिव्यांगासाठी नेहमी झटणारा नेता जर कुणी विचारलं तर मा. ना. श्री बच्चू भाऊ कडू हे नाव पटकन डोळ्यासमोर येत. ते अचलपूर मतदारसंघाचे आमदार आहेत. ते त्यांच्या अनोख्या आंदोलनासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. प्रहार संघटनेच्या माध्यमातून युवकांचे संघटन करून त्यांनी दिव्यांगांचे प्रश्न आक्रमक पणे समोर आणले आहेत. त्यांनी दिव्यांगासाठी आंदोलन छेडले आणि आपल्या आंदोलनाने त्यांनी दिल्ली दरबार ही हलवलेला आहे. त्यांनी केलेल्या अनेक लोकहितवादी कामामुळे ना. बच्चू कडू यांना लोकनेता म्हणून अधिक लोकप्रियता मिळाली आहे. तरुणांमध्ये त्यांची आक्रमकता अधिक पसंद केली जात आहे.
नेता म्हटल की गाड्यांचा ताफा, 2, 4 बंगले प्रचंड पैसा, पण एक नेता असा आहे जो शेतकऱ्यासाठी अनवाणी पायाने फिरतो, जो शेतकऱ्यासाठी मोटार सायकल वर रॅली काढतो. जो शेतकऱ्यासाठी काहीही करायला तयार आहे, कुठंही खुर्ची टाकून बसायला तयार आहे. खुठल्याही अधिकाऱ्यांशी भिडायला तयार आहे. ते म्हणजे आमचे बच्चू भाऊ.
कोणताही थाट नाही. बंगला आलिशान गाड्या घेऊन हा माणूस मिरवत नाही. अगदी सर्व सामान्य कार्यकर्त्या प्रमाणे कार्यकर्त्यांमध्ये राहून काम करतो.
पद, पैसा आणि प्रतिष्ठा या तीनही गोष्टीचं काहीच घेणं देणं नसलेला अहंकारशून्य माणूस म्हणजे बच्चू भाऊ.
जसं हे नाव घेतलं तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या लोकांचे कान वर होईल अस हे नाव.
भाऊ च व्यक्तिमत्त्व म्हटल की सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत पोहोचेल असा व्यक्ती म्हणायला हरकत नाही. लाल दिव्याची गाडी (मंत्री पद) जरी भेटली परंतु भाऊंनी जनतेशी असणारी नाळ तुटू दिली नाही. बच्चू भाऊ हे आधीपासूनच भन्नाट विचारांचे व्यक्तिमत्त्व, त्यांचे आंदोलन असो की काम करण्याची पद्धत सरकारी यंत्रणेला सळो की पळो करून सोडने व अधिकाऱ्यांची झोप उडवणे, अन्याय झालेल्या व्यक्ती साठी, न्याय मिळवून देण्यासाठी आक्रमक पद्धतीने आवाज उठवने हे त्यांचे खास वैशिषट्य.
बच्चू भाऊच्या कार्याची रुग्ण सेवेसारख्या समाजकार्यातून सुरुवात झाली. भाऊंच्या विचारांची कुवतच त्यांना असामान्य ठरवते. मदत कुठे, कुणाला, कशी करावी हे भाऊ कडूनच शिकावं. रुग्णसेवा करता करता रक्तदान नेत्रदान आणि पुन्हा दिव्यांगाचे प्रश्न समस्या. भाऊंनी आजपर्यंत अनेक दिव्यांगांची तऱ्हे तऱ्हेने मदत केली आहे. बच्चू कडू यांनी लग्न केलं तेही गांधी जयंती च्या मुहूर्तावर, होणारा खर्च टाळून 2 हजार दिव्यांगाना मदत केली. गळ्यात हार घातले नाहीत तर तिरंगा झेंडा एकमेकांना दिला. मंत्र मंगलास्टक गायली गेली नाही तर वंदेमातरम् आणि राष्ट्रगीताच्या सुरावर लग्न लावलं. रडत येणारे अनेक चेहरे भाऊच्या दरबारातून हसत परत जातात.
सर्वांना भाऊ पुढील गोष्टीमुळे आवडतात हे असे व्यक्ती आहेत की कसलाही स्वार्थ मनात ठेवून काम करत नाहीत. जे काही करतात ते सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी व भल्यासाठी. अधिकारी वर्गाकडून काम करून घेण्याची ताकद या माणसात आहे, पोकळ आश्वासन देऊन लोकांच्या मनाचे समाधान करणे या माणसाला कधी जमलेच नाही.
बच्चू भाऊ आज मंत्री पदाचा दर्जा असणाऱ्या पदावर आहे, पण त्यांचं राहणीमान अगदी साधं आहे. त्यांच्या पाया मधली चप्पल साधी असते, अंगावरचे कपडे सुद्धा अतिशय साधे असतात. एवढा मोठा माणूस अगदी साधेपणाने आयुष्य जगते. साधी राहणी उच्च विचार याचा नक्कीच सार्थ अभिमान एक कार्यकर्ता शुभचिंतक म्हणून मला आहे.
राजकारण म्हटल की कमाई ही आलीच, राजकारणामधून कित्येक लोकांनी नको तेवढी संपत्ती जमा केली. पण कित्येक वर्षापासून जी व्यक्ती आमदार आहे. राज्यमंत्री होऊन गेली पण संपत्ती चा लोभ ज्यांनी केला नाही त्याच जिवंत उदाहरण म्हणजे बच्चू भाऊ कडू. ही बाब मनाला स्पर्श करून जाते. भाऊ सोबत काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची भाऊ ला जान आहे. सोबतच्या लोकांना खाली झोपवून स्वतः भाऊ मधी मख मलीच्या गादीवर झोपणारा माणूस नाही. सोबत असणारी माणसं गादीवर झोपवून स्वतः खाली झोपनारा माणूस म्हणजे बच्चू भाऊ. दिव्यांग लोकांचा आधार, आजपर्यंत दीव्यांग व्यक्तींचे प्रश्न सोडविण्याचे अतोनात प्रयत्न भाऊंनी केलेले आहेत. कित्येक आंदोलन केली. दिव्यांगांच्या न्याय हक्कासाठी ही व्यक्ती सदैव अन्याय विरूद्ध लढून न्याय देण्याचा प्रयत्न करत असते याच प्रयत्नाची फलश्रुती म्हणजे आज दीव्यांग बांधवांसाठी स्थापन झालेले स्वत्रंत "दीव्यांग मंत्रालय". स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाच पूर्ण श्रेय भाऊंना लाभते. अश्या कित्येक बाबी आहेत की सांगाव्या तेवढ्या कमीच आहेत. या सर्व गोष्टींमुळे भाऊ "दिव्यांगांचे कैवारी" म्हणून ओळखले जातात.
सत्यासाठी लढतो अधिकारांसाठी झगडतो, म्हणूनच आमचा नेता आम्हाला जीवा पार आवडतो. "अपना भिडू बच्चू कडू"
आमचे मार्गदर्शक मा. ना. श्री बच्चू भाऊ कडूंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास उत्तम निरोगी दीर्घायुष्य लाभो. आणि आपल्या कडून अशीच सामान्य गरीब जनतेची सेवा घडत राहो. हीच गजानन महाराज चरणी प्रार्थना.
0 Comments