Advertisement

भेंडवळ येथील* *पुलावर पाणी साचल्याने विद्यार्थी व नागरीक यांचे हाल*

*भेंडवळ येथील* *पुलावर पाणी साचल्याने विद्यार्थी व नागरीक यांचे हाल* जळगाव जामोद दि 13: तालुक्यातील हद्दीत येतअसलेल्या भेंडवळ पासून एक किलोमीटर अंतरावरील पुलाचे व रस्त्याचे काम चालू आहे ऐन पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पाऊस सुरू असताना रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचले असून रस्त्याची पूर्णतः चाळण झाली आहे त्या रस्त्यांवरून चालताना शाळेचे विद्यार्थी तसेच नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत असून चिखलमय रस्त्याने जाता येताना नागरिक मोटरसायकल स्लिप होऊन नागरिक पडत असून पायी जाणाऱ्यांना विद्यार्थी सुद्धा मोठा त्रास या रस्त्यांमुळे सहन करावा लागत आहे.या चिखलमय रस्त्यामुळे रात्रीच्या वेळेस मोठी जीवित हानी पण होऊ शकते. नागरिकांना सुख सुविधा पुरविण्यात संबंधित विभाग असमर्थ ठरत असून भेंडवळ गावातील नागरिकांना रस्ता दुरुस्ती सुद्धा करू शकत नाही. संबंधित विभागाच्या अशा भोंगळ कारभारामुळे एखाद्याचा जीव गेल्यावरच भेंडवळ येथील रस्ते होतील का असा प्रश्न येथील सर्वसामान्य नागरिकांना पडला असून संबंध विभागाने रस्ते दुरुस्तीबाबत काय तो निर्णय घेऊन भेंडवळ रस्त्याचे रस्ते तात्काळ दुरुस्त करून देण्याची मागणी येथील नागरिक करीत आहे..*

Post a Comment

0 Comments