Advertisement

जळगाव जा. शहरात ABVP ने काढली 500 फूट ऐतिहासिक तिरंगा पद यात्रा

प्रतिनिधी नागेश भटकर
15 ऑगस्ट 76 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा जळगाव जा. कडून जळगाव शहरामध्ये 500 फूट लांबीची ऐतिहासिक अखंड तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. यामध्ये शहरातील सर्व महाविद्यालयातील हजारो विद्यार्थ्यांनी अभाविप च्या आवाहनाला प्रतिसाद देऊन मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. जळगाव जामोद शहरामध्ये अशाप्रकारे 500 फूट अखंड तिरंगा पदयात्रा प्रथमच निघाली आहे. तिरंगा यात्रेमुळे संपूर्ण शहरात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले व विद्यार्थी परिषदेच्या पुढाकाराने ह्या ऐतिहासीक यात्रेचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. ह्या तिरंगा पदयात्रेचे उद्घाटन व सुरवात सीमा सुरक्षा दल (BSF) चे माजी सैनिक श्री.मारोती मस्के ह्यांच्या हस्ते श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालया समोरून करण्यात आले. व दुर्गा चौक - चौबारा - मालिखेड - चावडी - नगर परिषद समोरून - पोलिस स्टेशन च्या मार्गे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयाच्या मैदानात समारोप करण्यात आला. ह्यावेळी अभाविप चे जिल्हा संघटन मंत्री राहूलजी खरात, प्रदेश कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत बोबडे, जळगांव जा.नगरमंत्री प्राची बोरखडे, नगर सहमंत्री विशाल इंगळे, नगर सहमंत्री दीक्षा राठी, विद्यार्थिनी प्रमुख गौरी वानखेडे, विकासार्थ विद्यार्थी कार्य प्रमूख नेहा बोडखे, सेवार्थ विद्यार्थी कार्य प्रमुख साक्षी सपकाळ, तंत्र शिक्षण विद्यार्थी कार्य प्रमुख प्रीती बोडखे, खेळ कार्य प्रमुख अंजली सपकाळ, प्रसिद्धी प्रमुख अनिकेत वाघ, गौरव ढगे, कपिल शर्मा, मोहित तायडे, दत्तात्रय घोलप,गणेश दांडे, रितेश ढगे, वैभव घूले, विनय मिसाळ, आकाश अंभोरे, आदी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments