Advertisement

जळगांव जामोद तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा वंचित बहुजन आघाडी ची मागणी

प्रतिनिधी नागेश भटकर
जळगांव जामोद:- दिनांक ३१ ऑगस्ट२०२३ रोजी वंचित बहुजन आघाडी जळगाव जामोद शहर व तालुक्याच्या वतीने उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांना निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये नमूद केले आहे की गेल्या २२ जुलै पासून जळगाव जामोद तालुक्यामध्ये व शहरांमध्ये कुठेही पाऊस पडला नाही या पाऊस न आल्यामुळे शेतकऱ्यांच्या हक्कांची पिके सोयाबीन कपाशी ,मुंग उडिद,मका व इतर यासारखे पिके कोरपुन गेलेली आहे यामुळे यामुळे तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे या परिस्थीने शेतकरी हवालदिल झाला आहे यापूर्वी दिनांक २२ जुलै रोजी सातपुडा पायथ्याशी अतिवृष्टी झाल्याने संपूर्ण जळगाव जामोद तालुका हा महापुराच्या पाण्याने होरपळून निघाला यामध्ये अनेकांचा संसार रस्त्यावर आला जिवणाश्यक वस्तुसह घरे, गुरेढोरे वाहुन गेलीत त्याचप्रमाणे पुराच्या पाण्यामध्ये हजारो एकर जमीन खरडून गेली यामध्ये सर्व सामान्य मानसासह शेतकरी बांधवाचे अतोनात नुकसान झाले त्यातच २२जुलै ते आज पर्यंत पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसोबतच मुक्या प्राण्यांचे सुद्धा हाल होत आहेत यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मागणी करण्यात आली की शेतकरी बांधवांनी काढलेले पीक कर्ज हे पूर्णतः माफ करण्यात यावे पुन्हा रुपी त्यांना पीक कर्ज देण्यात यावेआणि जनावरांसाठी चारा डेपो सुरू करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन देण्यात आले या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष रतन भाऊ नाईक शहराध्यक्ष आजम कुरेशी तालुका उपाध्यक्ष सुनील बोदडे, महिला आघाडीच्या पार्वताबाई इंगळे युवा नेते प्रकाश भिसे तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कोकाटे तालुका महासचिव विजय सातव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत अवसरमोल ज्येष्ठ कार्यकर्ते गुलाबराव आठवले अमोल तायडे संतोष पवार जगन्नाथ भास्कर भगत कैलास भगत नितीन भगत यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत

Post a Comment

0 Comments