Advertisement

खरडून गेलेल्या शेतीचा मोबदला सात दिवसाच्या आत न मिळाल्यास १३ सप्टेंबर पासून वंचित चे आमरण उपोषण

प्रतिनिधी नागेश भटकर 
जळगांव (जा):- दिनांक ४ सप्टेंबर २०२३ रोजी तहसील कार्यालय जळगांव येथे निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये जळगांव जामोद तालुक्यात सातपुडा पर्वतात २२ रोजी ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी झाल्याने नदी नाल्यांना खूपच मोठा महापूर आल्याने महापूराचे पाणी जळगांव (जा) तालुक्यातील सर्वच नदी नाले व परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून गेल्यामुळे शेती बागायती पिकांसह पुर्णतः खरडून गेल्याने शेतीचे रूपांतर नदीत झाले . यामध्ये अनेक शेतकऱ्यांची शेती ही यापुढे कधीच पेरणीयोग्य राहिलीच नसल्याने यामध्ये शेतकऱ्यांचे कधीच भरून न निघणारे नुकसान झाले आहे व या महापुराच्या पाण्याने अनेक शेतकऱ्यांच्या विहीरी सुद्धा खचून गेल्या असून काही शेतकऱ्यांच्या विहीरी तर मोटार पंपासह जमिनदोस्त झाल्या आहेत . बागायती पिकाला पाणी देण्यासाठी शेतात टाकलेले ठिंबकच्या नळ्या व स्प्रिंकलर सेट हे पाईपांसह पुर्णतः महापुरात वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . त्याचप्रमाणे हातातोंडाशी आलेले उडीद,मुंग, सोयाबीन,तुर,मक्का, वांगे व कपाशीचे पिक सुद्धा पूर्णतः वाहून गेल्याने शेतकरी पुर्णतः हवालदिल झाले आहे . महापुराने पिकांसह खरडून गेलेल्या शेतीचे तलाठ्यांकडून पंचनामे सुद्धा करण्यात आले परंतु दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला तरी अद्यापही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून एक दमडीही मदत नाही . त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी शासनाच्या मदतीपासून अद्यापही वंचितच आहेत. तरीही आपणास विनंती आहे की खरडून गेलेल्या शेतीचा मोबदला तात्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्या मध्ये जमा करावा अन्यथा आपल्या कार्यलयासमोर १३/०९/२०२३, बुधवार रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल असे निवेदनात नमूद आहे. निवेदन देते वेळी शहर अध्यक्ष, आजम कुरेशी, मा.ता.अध्यक्ष रतन नाईक, ता.उपाध्यक्ष सुनिल बोदडे, युवा नेते प्रकाश भिसे, ता.उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कोकाटे, प्रशांत अवसरमोल संचालक कृ.उ.बा.समिती , रविंद्र जाधव सरपंच, गुलाबराव आठवले, भास्कर भगत, संतोष पवार, कैलास भगत, निलेश वानखडे, नितीन भगत,अमोल तायडे, गौतम पवार, संजय वानखडे, सह इतर कार्यकर्ते हजर होते.श

Post a Comment

0 Comments