Advertisement

60 खेडी खांबोरा पाणी पुरवठ्या बाबत आमदार सावरकराची महाराष्ट जिवन प्राधीनीकरण योजना अधिकार्‍यासोबत बैठक

60 खेडी खांबोरा पाणी पुरवठ्या बाबत आमदार सावरकराची महाराष्ट जिवन प्राधीनीकरण योजना अधिकार्‍यासोबत बैठक
 हिवरखेड प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर
 ६० खेडी खाम्बोरा ग्रामीण पाणी पुरवठा ब योजने अंतर्गत आलेल्या गावांचा पाणी पुरवठ्याचा कालावधी कमी करा तसेच जलजीवन मिशन अंतर्गत सदर योजना तातडीने कार्यान्वित करण्यासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत योजनेचा सविस्तर आढावा घेतला. सध्या पाण्याची गरज लक्षात घेता नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी व या संदर्भात नियोजन करावा यासाठी आमदार सावरकर यांनी तातडीने बैठक घेऊन तांत्रिक आणि होणारी अडचण भविष्यात होणारा पाणीटंचाई आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले.
 पूर्वीची ६४ खेडी खाम्बोरा ग्रामीण पाणी पुरवठा योजना जीर्ण झाल्याने या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाणी पुरवठ्यामध्ये निर्माण झालेली अडचण लक्षात घेऊन सदर योजनेतील ६० गावे तसेच ४ गावे वेगळी करून दोन योजना तयार करण्यात आल्या. सदर दोन्ही योजनांना जलजीवन मिशन योजनेंतर्गत स्वतंत्र मान्यता प्रदान करण्यात आली. खाम्बोरा ६० गाये प्रादेशिक पाणी पुरवठा योजने करिता सुमार ६८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून खाम्बोरा ४ गावे (बोरगाव, सुकळी, कानशिवणी, निपाणा) योजनेकरिता २१ कोटी रुपयाची शासनाने मंजुरी दिली असून दोन्ही योजनांची कामे प्रगती पथावर आहे. सदर योजनांची प्रगती व तातडीने पूर्ण करावयाचा कालावधी लक्षात घेऊन या बाबत आमदार रणधीर सावरकर यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेच्या अधिकाऱ्यांसोबत सविस्तर आढावा घेतला. ६० गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना अलीकडच्या काळातच टप्प्या टप्प्याने कार्यान्वित करण्याच्या सूचना आमदार सावरकर यांनी दिल्या तसेच संपूर्ण योजना येणाऱ्या उन्हाळ्यापूर्वी कशी कार्यान्वित होईल याचे नियोजन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने करावे. योजना कार्यान्वित करण्यापूर्वी वाढती लोकसंख्या याचा अंदाज घेऊन वितरण व्यवस्था पाण्याच्या टाक्या उपसा करावयाचे विद्युत पंप याचा विचार करण्यात यावा. या योजनेंतर्गत असलेल्या दहीगाव, आपातापा, धोतर्डी, पळसो, कौलखेड, या गावातील उंच पाण्याच्या टाक्यांचे काम जवळपास पूर्ण झालेले असून या भागातील पाणी वितरणाच्या पाइपचे जाळे ८६% पूर्ण झाल्याने प्रथम टप्प्यात या भागातील पाणी पुरवठा डिसेंबर-२३ महिन्याच्या पहिल्या आठवड्या पर्यंत कार्यान्वित करण्याच्या सूचना आमदार सावरकर यांनी दिल्या. वितरण व्यवस्थेमधील उपसा करणाऱ्या विद्युत पंपाची क्षमता वाढविण्यात यावी जेणे करून पाणी पुरवठा सक्षम रित्या करण्यात येईल. योजनेच्या टोकाकडील नवथाळ (१२.५ एच पी), घुसर, (१० एच पी) आलियाबाद(७.५ एच पी),आपातापा (७० एच पी) अश्व शक्तीचे पंप लावण्यासोबतच इतरही क्षेत्रातील आढावा घेऊण त्याप्रमाणे पंपाचे नियोजन करण्यात यावे. आज परिस्थितीत या भागात जुन्या योजनेद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असून त्याचा कालावधी १५ दिवस इतका आहे. सदर कालावधी ५-६ दिवसांवर आणण्यासाठी या योजनेच्या पूर्वीच्या १२० एच.पी.या पंपा ऐवजी २०० एच.पी. पंप बसविण्यात यावा जेणे करून पाणी पुरवठा अधिक प्रमाणात करता येईल. तसेच योजनेतील पाणी गळती कमी करणे व पुरवठा नियंत्रित करणे या करिता जिल्हा परिषद पाणी पुरवठा योजनेने कंत्राटी पद्धतीवर अभियंते तसेच टाईमकीपर यांची नेमणूक करण्याच्या सूचना आमदार रणधीर सावरकर यांनी केली. आढावा बैठकीसाठी जीवन प्राधिकरण यंत्रणेचे अधीक्षक अभियंता गव्हाणकर, कार्यकारी अभियंता राठोड, उप अभियंता देशमुख, अभियंता अजय मालोकार, उप अभियंता चौधरी, कनिष्ठ अभियंता मेहरे उप अधीक्षक अभियंता पिंपळकर, कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद दरेकर, उप अभियंता अनिल चव्हाण, कंत्राटदार सस्ते पाटील व श्याम माहोरे, पी एम सी चे अभियंता चव्हाण, व्यवस्थापक प्रवीण मंडाले शाखा अभियंता उमाळे, उप कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद नांदे आदी उपस्थित होते. प्रशासनाचा आपसातला संवाद नसल्यामुळे होणारा त्रास नागरिकांना होणार नाही याची दक्षता घेण्याची निर्देश सुद्धा आमदार सावरकर यांनी दिली तसेच या भागातील नागरिकांना पाणी उपलब्ध करण्याच्या दिशेने पर्यायी व्यवस्था तयार करून सहकार्य करण्याचे आवाहन करून भविष्यात पाणीटंचाई होणार नाही याचा सुद्धा 25 वर्षाचा आराखडा तयार करण्याचे सुद्धा निर्देश दिले

Post a Comment

0 Comments