तेल्हारा प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर
तेल्हारा दि.३० (ता प्र) जगदंबा मातेने महिषासुराचा वध केला, श्रीरामांनी रावणाचा वध केला, पांडवांनी लपवुन ठेवलेली शमी वृक्षावरील शस्त्रे उतरविली,डॉ हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली,समतायुक्त समाज उभा करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मचक्र प्रवर्तन केले तो विजयादशमीचा दिवस होता.शक्तीच्या उपासनेसोबतच शिलवान स्वयंसेवक घडविण्याचे कार्य रा.स्व संघ करीत आहे.असे प्रतिपादन रा.स्व.संघाचे प्रांत महाविद्यालयीन कार्यप्रमुख नितिन जांभोरकर यांनी दि.२९ ऑक्टोबर रोजी तेल्हारा संघ शाखेच्या विजयादशमी व शस्त्रपूजन कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलतांना केले. तेल्हारा येथील स्वामी विवेकानंद ज्ञानपीठाच्या सभागृहात रा.स्व. संघ शाखा तेल्हाराचा विजयादशमी व शस्त्रपूजन कार्यक्रम प्रसंगी मंचावर तालुका संघचालक माधव बनकर,नगर संघचालक गजानन मुंजे,प्रमुख अतिथी मातोश्री पतसंस्थेचे अध्यक्ष कमल चांडक,मुख्यवक्ते प्रांत महाविद्यालयीन कार्यप्रमुख नितीन जांभोरकर उपस्थित होते. मान्यवरांचे आगमन होताच स्वयंसेवकांनी स्वागत प्रणाम देऊन त्यांना सन्मानित केले. मान्यवरांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आल्यावर ध्वजारोहण, प्रार्थना,गणवेशातील स्वयंसेवकाचे सांघिक व्यायाम योग,सांघिक गीत झाले.शहर सहकार्यवाह मनिष गोयनका यांनी मान्यवरांचा परिचय व प्रास्ताविक केले.अमृत वचन पार्थ पोहने व सुभाषित कथन लोकेश उजाड यांनी केले.चैतन्य नळकांडे यांनी वैयक्तिकक्त गीत गायीले. भारताचा आत्मा धर्म आहे एकरस समाज ही देशाची मानसिक शक्ती आहे.ती सुदृढ करण्याचे काम संघ अविरत करित आहे.असेही प्रमूख वक्ते बोलले
रा.स्व.संघाचे स्वयंसेवक राष्ट्रजागरणाचे कार्य करीत आहेत.याकार्यात संत महात्मा यांचे मोलाचे योगदान लाभले आहे.या विजयादशमी उत्सवाचे प्रमुख अतिथी कमल चांडक बोलले .सांघीक व्यायाम योगाचे संचालन पराग कुलकर्णी,प्रार्थना गायनाची संथा हरिदास चुंगडे यांनी दिली. प्रमुख अतिथी यांचे स्वागत गजानन मुंजे,माधवराव बनकर यांनी केले.उत्सवात संघाचे जिल्हा, तालुका,नगर,उपखंडाचे दायित्वधारी अधिकारी स्वयंसेवक,निमंत्रित नागरिक,पत्रकार उपस्थित होते.ध्वजावतरणाने उत्सवाचे समापन झाले. *पथसंचलनावर ठिकठिकाणी पुष्पवर्षाव* तेल्हारा शहरात विजयादशमीच्या औचित्याने २९ ऑक्टोबर रोजी सुमारे १५० गणवेशधारी स्वयंसेवकांनी सायंकाळी ५:३० वाजता स्वामी विवेकानंद ज्ञानपीठातून शानदार पथसंचलन केले.नागरिकांनी पथसंचलन मार्गावर सडासंमार्जन करून रांगोळ्या काढून सजावट केली होती.घराघरातून पुष्पवर्षाव करून संचलनाचे स्वागत करण्यात आले.स्वामी विवेकानंद ज्ञानपीठात संचलनाचे विजयादशमी उत्सवात रूपांतर झाले.शहर सेवा प्रमुख सुनिल बावस्कर यांनी संचलनाचे सूत्रसंचालन केले.
0 Comments