वंचित च्या वतीने उद्या प्रशासन जागर आंदोलन!!
जळगांव जा:- २२ जुलै रोजी सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी झालेल्या ढगफुटीमुळे जळगांव जामोद तालुक्यातील प्रत्येक नदी नाल्याला प्रचंड महापूर आला होता या महापुरात हजारो हेक्टर शेती खरडून गेली, पिके वाहून गेली गुरे ढोरे मृत्युमुखी पडले अनेक नागरिक बेघर होऊन संसार उघड्यावर पडले आहे, अश्या परिस्थीतीत शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे परंतु उद्या १०० दिवस होऊन सुद्धा शासनाकडून एक रूपयाची सुद्धा मदत मिळालेली नाही म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 'प्रशासन जागर डफडे बाजावो' एक दिवसीय धरणे आंदोलन शेतकऱ्यांच्या विविध मागन्यांसाठी करणार आहोत.
मागण्या:- १) खरडून गेलेल्या जमिनीची व पीक नुकसानीची तात्काळ भरपाई शेतकऱ्यांना द्यावी.
२)खरडून गेलेल्या शेतातील पिकांचा शंभर टक्के पिक विमा देण्यात यावा.
३)शेती उपयोगी साहित्य पुरामध्ये ज्या शेतकऱ्यांची वाहून गेले अशा नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना प्राधान्याने शासनाच्या योजनेचा लाभ द्यावा.
४)पुरामुळे बेघर झालेल्या नागरिकांना विना निकष घरकुल मंजूर करून द्या.
५)पुरामुळे ज्यांची शेती पूर्णतः खरडून गेली असेल अशा शेतकऱ्यांना विज बिल माफ करण्यात यावे.
६) पुरामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरी खचल्या असतील अशा शेतकऱ्यांना तात्काळ नव्याने विहिरी मंजूर करून द्या.
७)खरडून गेलेली शेती पेरणीयोग्य करून देण्यात यावी
८)यलो मोझँक रोगाचे सर्वे करून आर्थिक मदत द्या
या मागन्यांसाठी उपविभागीय कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने दि:-३१/१०/२०२३ मंगळवार रोजी आंदोलन करणार आहोत तरीही पूरग्रस्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे!
आयोजक:- वंचित बहुजन आघाडी जळगांव (जामोद)
0 Comments