Advertisement

तुरीचा भाव विचारायला आला, मालकाच्या हातावर 'चार लाखाच्या तुरी' देऊन पसार झाला!

तुरीचा भाव विचारायला आला, मालकाच्या हातावर  'चार लाखाच्या तुरी' देऊन पसार झाला!
प्रतिनिधी नागेश भाटकर
आसलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मधून व्यापाऱ्याचे अज्ञात चोरांनी केले चार लाख रुपये लंपास जळगाव जामोद कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांना सोयीचे व्हावे म्हणून धान्य विक्रीचे पैसे नगदी स्वरूपात देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या मुळे व्यापारी धान्य खरेदीसाठी नगदी रकम आपल्याजवळ जमा ठेवतात याचाच फायदा घेत अज्ञात तीन चोरट्यानी व्यापारी अजाबराव एकनाथ कापसे यांच्या जोडील नगदी 3लाख 95 हजार 485 रुपये असलेली बॅग दिनांक 24 ऑक्टोंबर रोजी लंपास केली आहे याविषयी व्यापारी अजाबराव कापसे यांनी जळगाव जामोद पोलिसात तक्रार दाखल केली आहे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की आसलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मी शेतकऱ्यांचा
 शेतमाल विकत घेत असताना नजर चुकीने बाजूला ठेवलेली 3 लाख 95 हजार 485 रुपये असलेली हिरव्या रंगाची चेन असलेली बॅग तीन आरोपी पैकी एका आरोपीने तुरीचा भाव विचारून दोन आरोपींनी बॅग चोरून नेली व्यापारीच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध कलम 379,34 भांदवी अन्वये गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास ठाणेदार दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय पांडुरंग इंगळे करीत आहे

Post a Comment

0 Comments