Advertisement

पुरग्रस्त शेतकरी बांधवांसाठी आमरण उपोषणाचा इशारा

पुरग्रस्त शेतकरी बांधवांसाठी आमरण उपोषणाचा इशारा

प्रतिनिधी जळगांव जामोद:- २२ जुलै २०२३ रोजी झालेल्या अतिवृष्टीचा फटका संपूर्ण जळगांव जामोद तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला यामध्ये शासनाने मदत जाहीर केली परंतु महसुल कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईमुळे काही शेतकरी, शेतमजुर शासकीय निधी पासुन वंचितच राहले आहेत या बाबतीत वंचित बहुजन आघाडी चे तालुका उपाध्यक्ष सुनिलभाऊ बोदडे यांनी दिनांक १९/०१/०२४ रोजी तहसील कार्यालयात निवेदन देऊन दिनांक २५/०१/२०२४ पासुन आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला या निवेदनात नमुद आहे की २२ जुलै रोजी जळगांव जामोद शहरासह संपूर्ण तालुका हा महापुराच्या पाण्याने होरपळून निघाला हजारो एकर शेती हि पुराच्या पाण्याने खरडुन गेली परंतु काही महसुल कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईमुळे बरेचशा शेतकरी बांधवांच्या शेतीचे पंचनामे हे चुकीचे झालेले आहेत प्रत्यक्षात शेतीचे क्षेतफळ खरडुन गेलेले असतांना त्यांच्या पंचनाम्यावर पिकनुकसानीचा पंचनामे दाखविण्यात आले आहेत तर नुकसानीचे क्षेत्रफळ सुद्धा कमि दाखवण्यात आले आहेत वेळोवेळी महसुल कर्मचारी यांचेशी संपर्क करुनहि शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याने अखेर पुरग्रस्त शेतकरी बांधवांना सोबत घेऊन उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे यावेळी वंचित बहुजन आघाडी चे तालुका उपाध्यक्ष सुनिलभाऊ बोदडे, जिल्हा उपाध्यक्षा सौ पार्वताबाई इंगळे, गुलाबराव आठवले, संतोष पवार, रंजित डोंगरदिवे, भिमराव पवार, संतोष पवार, संजय वानखडे सह पुरग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments