बाळासाहेब नेरकर कडुन
अमरावती विभागातील परीट (धोबी ) समाजाच्या वतीने दि.28.01.24.रविवार ला अकोला जिल्ह्यातील प्रसीद्द तिर्थक्षेञ वारी हनुमान येथे कार्यक्रमाला तीन आमदार प्रदेश सरचीटनीस आमदार रणधीर सावरकर, मा.आ.प्रकाशभाऊ भारसाकळे व आमदार. हरिषभाऊ पिंपळे ,लोकसभा सयोजक अकोला अनूप धोञे हजर असताना यांना निवेदन देण्यात आले.यात आम्हाला
70 वर्षांपासून शासनाने आमचे हक्काचे s.c.चे आरक्षण हिसकावून घेतले. आम्ही त्याकरिता बरेचदा शांततेच्या मार्गाने उपोषण, मोर्चे, धरणे आंदोलन इत्यादी मार्गाने लढा दिला.पण सरकार याबाबत परीट धोबी समाजाबद्दल ऊत्सुक दिसत नसुन.
सध्याच सरकारने एका समुदायाला आंदोलन केल्यानंतर लगेच o.b.c.चे आरक्षण जाहीर करून देण्याचे आश्वासन दिले.पण आमचे चालु होते ते पुर्विच्या काळातील सरकारणे बंद केले तेच आमचे राखीव आम्हाला चालु करुन द्या
.म्हणून सरकारला व प्रतीनीधीला जागृत करन्यासाठी हा लढा असुन हा लढा अजून प्रखर करण्याच्या उद्देशानेच आम्ही आता अमरावती विभागातील पाचही जिल्ह्य़ातील आमदार व खासदारांना निवेदने देणे सुरू करण्याची चळवळ हाती घेतलेली आहे.
त्यासाठी धोबी समाजानेही न्यायालयीन दरवाजा ठोठावयास पाहिजे.
वरिल आमदारांना निवेदन देतांना भाजपा नेते संतगाडगेबाबा सेवा समीती सस्थापंक बाळासाहेब नेरकर,.विश्वनाथ राऊत,गाडगेबाबा पतसस्थाध्यक्ष कारंजा लाड, प्रा.रमेश सांबसकर, वैराग्यमूर्ती संपादक.सतिश सांबसकर , श्री.योगेश मोहड , श्री.अजय रोहणकर,अमोल नेरकर राजु माहुलकर दिपक मुंडोकार अजय मोंडोकार प्रवीण सपकाळ, बंडूजी ढबाले,रवी रामेकर अभय ठाकरे-अभी नांदूरकर-,नाचोने,इ.धोबी समाजाचे व इतर जाती लोक उपस्थित होते.सर्वांनी धोबी समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण मिळवून देण्याकरिता अंतःकरण पूर्वक प्रयत्न करण्याचे आश्वासन वरील आमदारानी या प्रसंगी दिले.
0 Comments