Advertisement

सातळी येथील एल्गार परीवर्तन मेळाव्याला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद

सातळी येथील एल्गार परीवर्तन मेळाव्याला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद
प्रतिनिधी जळगाव जामोद 
घोड्यावर मिरवणुक काढत ग्रामस्थांनी केले रविकांत तुपकरांचे जंगी स्वागत...

जळगाव जा. :- सातळी येथे शेतकरी-कष्टकरी-मजुर व तरुणांचा एल्गार मेळावा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता.

या मेळाव्यामध्ये सोयाबीन-कापसाची दरवाढ झाली पाहिजेत,२२ जुलैच्या ढगफुटी मुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे अतोनात नुकसान झाले त्याची नुकसानभरपाई मिळाली पाहिजे व इतर काही मागण्या घेऊन एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

सदर मेळाव्या अगोदर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना ग्रामस्थांनी घोड्यावर बसून सातळी गावातुन जंगी मिरवणूक काढून नंतर मेळाव्याला सुरूवात केली. या मेळाव्याला ग्रामस्थांनी व परीसरातील लोकांनी प्रचंड उपस्थित दाखवली.

Post a Comment

0 Comments