Advertisement

अतीवृष्टीच्या नुकसानीत तहसीलदार यांचा भ्रष्ट कारभार.

अतीवृष्टीच्या नुकसानीत तहसीलदार यांचा भ्रष्ट कारभार.
मागील वर्षी २२ जुलै ला संपुर्ण तालुक्यात ढगफुटी सदृष्य पुर परीस्थीती निर्माण झाली होती. यात पुर्ण तालुक्यात शेती व पिकांचे तसेच वस्ती वाड्यात प्रचंड नुकसान झाले होते. जनतेच्या रोषामुळे महसुल प्रशासनाने तालुक्यात नुकसानीचे पंचनामे करुन नुकसान भरपाई दिली. मात्र या प्रकरणात योग्य नुकसानग्रस्त सोडुन बनावट शेतकरी तयार करुन त्यांच्या खात्यात करोडो रुपये जमा करण्यात आले. या कामी महसुल यंत्रणा कार्यरत होती असे दिसुन आले. बनावट शेतकरी दाखवुन त्यांच्या खात्यात नुकसानीचे पैस वळते करण्यात आले. बनावट शेतकरी दाखवुन शासनाची लुट व खरे नुकसानग्रस्त यांचे शोषण करण्यात आले या संपुर्ण प्रक्रीयेत दोषी असलेली यत्रणा म्हणजे तलाठी , मंडळ अधिकारी व तहसीलदार व तस्सम अधिकारी यांचेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन त्यांचे तात्काळ कारवाई करण्यासाठी सरपंच संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष यांनी उपविभागीय अधिकारी जळगांव जा. यांचेकडे तक्रार वजा निवेदन सादर केले.

Post a Comment

0 Comments