कापसाचे पैसे थकवणाऱ्या डॉक्टरच्या रुग्णालयावर धडकले शेतकरी
कापूस खरेदी केला, मात्र त्याची देणीच दिली नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी डॉ. प्रफुल पाटील यांच्या चाळीसबिघास्थित गोजिरी हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला. डॉ. प्रफुल पाटील यांना समोर आणा, म्हणत शेतकरी आक्रमक झाले. निर्माण झालेल्या गोंधळामुळे डॉ. प्रफुल पाटील यांच्या परिवारामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. याबाबत माहिती समजताच नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांनी घटनास्थळी धाव घेत शेतकऱ्यांची समजूत काढल्याने प्रकरण निवळले.
रुग्णांना चांगली आरोग्य सेवा देत वैद्यकीय क्षेत्रात नाव कमविलेल्या डॉ. प्रफुल पाटील हे काही सहकाऱ्यांच्या मोहजाळाला बळी पडले. त्यांनी गतवर्षी कापसाचा व्यवसाय सुरू केला. एक विश्वासू व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेल्या डॉ. प्रफुल पाटील यांच्याकडे बघत आरंभ कंपनीच्या नावाखाली कापूस विक्रीचा व्यवसाय जोरात सुरू झाला. अनेक शेतकऱ्यांनी
त्यांना कापूस विकला. सुरुवातीला ठरल्या मुदतीत कापसाची रक्कम अदा करण्यात आली. व्यवसाय सुरळीत सुरू असतानाच अनेक शेतकऱ्यांची रक्कम आरंभ कंपनीकडे थकीत राहिली. कंपनीच्या वतीने काही मुदतीचे चेक व नोटरी स्वरूपात करारसुद्धा केले होते. डॉ. प्रफुल पाटील यांच्यावर शेतकऱ्यांनी दर्शविलेल्या विश्वासाला तडा गेला. ठरलेल्या मुदतीत कापसाची
रक्कम परत मिळत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये चकरा मारणे सुरू केले. शेतकऱ्यांची थकीत रक्कम करोडो रुपयांच्या घरात असल्याची बाब समोर आली. दरम्यान, परिस्थितीसमोर हतबल झालेल्या काही गरजवंत शेतकऱ्यांकडून डॉ. प्रफुल पाटील यांना धमकी वजा इशारेही देण्यात आल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीतही शेतकऱ्यांचा डॉ. प्रफुल पाटील यांच्यावर विश्वास मात्र कायमच होता. तर गत काही दिवसांपासून डॉ. प्रफुल पाटील हे पैसे आणण्याकरिता बाहेरगावी गेल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यातील शहापूर पोलीस स्टेशनअंतर्गत जवळपास साडेतीन कोटी रुपये थकीत असल्याप्रकरणी स्थानिक
एका व्यक्तीसह डॉ. प्रफुल पाटील यांच्यावर शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल झाले. याप्रकरणी शहापूरची पोलीस मलकापूरला तपासकामी चौकशी करून गेल्याचे कळते.२७ जुलै रोजी एक लाख रुपयांच्या आत रक्कम असलेल्या शेतकऱ्यांना त्यांचे पैसे अदा करण्याचे सांगण्यात आले होते. तशी सूचना हॉस्पिटलच्या
पोलिसांकडून संपूर्ण सहकार्य करू : ठाणेदार गिरी
डॉ. प्रफुल पाटील यांच्या वडिलांना घेऊन ठाणेदारही पोलीस ठाण्यात गेले. शहर पोलीस स्टेशनमध्ये जमावातील शेतकऱ्यांची बाजू पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांनी ऐकून घेतली. कुणीही कायदा हातात घेऊ नका त्याने लाभ होणार नाही किंबहुना तुमचे नुकसानच होणार आहे, त्यामुळे याप्रकरणी कायदेशीर मार्गाचा अवलंब करा, पोलीस प्रशासन तुम्हाला पूर्ण सहकार्य करेलअसे आश्वासन दिल्यानंतर प्रकरण निवळले.
गेटवर लावण्यात आली होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्यांच्या हॉस्पिटलवर पैसे मिळविण्याकरिता धडक दिली. हॉस्पिटलच्या वरील निवासस्थानावर गोंधळ निर्माण करण्यात आला. या वेळी डॉ. पाटील यांचे कुटुंबीय भयभीत झाले. घरी हजर असलेले त्यांचे वडील व शेतकऱ्यांमध्ये 'तू-तू, मैं-मैं' झाली. गोंधळात परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे निर्माण झाली असतानाच पोलिसांनी
घटनास्थळी धाव घेतली. घरात शिरलेल्या शेतकऱ्यांना समजावत बाहेर काढत ठाणेदारांनी शांततेचे आवाहन केले. डॉ. प्रफुल पाटील हे घरी नसून तुमचा व्यवहार त्यांच्याशी झालेला आहे. त्यामुळे या व्यवहारप्रकरणी सनदशीर मार्गाने कायदेशीररित्या मार्गक्रमण करा. निश्चितच तुम्हाला न्याय मिळेल, अशी समजूत काढत पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांनी सर्व शेतकऱ्यांना पोलीस स्टेशनमध्ये येण्याचे आवाहन केले.
0 Comments