Advertisement

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी, व भ्रष्ट कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यासाठी वंचित बहुजन युवा आघडीचे १४ ऑगस्ट पासून आमरण उपोषण...

*पूरग्रस्तांच्या मदतीसाठी, व भ्रष्ट कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यासाठी  वंचित बहुजन युवा आघडीचे १४ ऑगस्ट पासून  आमरण उपोषण...*
जळगाव (जा):- पूरग्रस्तांच्या मदतीसाठी, व भ्रष्ट कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यासाठी व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी वंचित बहुजन युवक आघाडीचे १४ आगष्ट रोजी  करणार आमरण उपोषण, २२ जुलै २०२३ रोजी झालेल्या महापुरामुळे हजारो नागरिकांची शेती खरडून गेली शेकडो नागरिक बेघर झाली छोटे मोठे टपरीधारक व्यावसायिक पूर्णतः उद्ध्वस्त झाले, तसेच ज्यांची खरोखर शेती, घरे, दुकाने महापुरात वाहून गेली परंतु ज्यांचे खरोखर  नुकसान झाले त्याने अद्यापही मदत मिळालेली नाही. परंतु ज्याची शेती, घरे, दुकाने इ. काहीच नुकसान झाले नाही त्यांना मात्र सक्षम मदत दिली. ज्यांच्या नावावर शेती नाही त्यांना नुकसान भरपाई, ज्यांचे कवडीचे नुकसान नाही परंतु सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या जवळचे आहेत त्यांना लाखोंची मदत घरातील प्रत्येकाच्या नावावर मदत दिल्या गेली, आणि त्याचे पुरावे सुद्धा आमच्याकडे आहेत. ही तर सरळसरळ शासनाची फसवणूक आहे आणि शासनाची फसवणूक करत असताना प्रशासनातील काही कर्मचारी, अधिकारी, कंत्राटी कर्मचारी यांचा या खोट्या प्रकरणात हात असल्याशिवाय असले  खोटे काम करणे शकच नाही. अश्या प्रकारचे खोटे काम करणाऱ्या कर्तव्यात कसूर व शासनाच्या पैशाचा अपहार करणाऱ्या मग तो तलाठी ,ग्रामसेवक, तहसील कार्यालयातील डाटाएन्ट्री ऑपरेटर,तहसीलदार, नायब तहसीलदार तसेच शेती नसताना खात्यावर नुकसान भरपाई रक्कम वर्ग करणारा शेतकरी हा गुन्ह्यास पात्र आहे.
पूरग्रस्त नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन आम्ही सर्व शेतकरी आमरण उपोषण करणार आहोत
मागण्या - 
१) शासनाच्या पैशाचा अपहार केल्या बद्दल व आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे.
२)पीकविमा कंपनीने नाकारलेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारी ग्राह्य धरून सरसकट पीक विमा द्यावा.
३) महापुरात ज्या शेतकऱ्यांचे घरे वाहून गेले अथवा घरे कोसळले असतील त्यांना मदत व विनानिकष घरकुल मंजूर करा.
४)ज्या शेतकऱ्यांक्या नांवावर शेती नाही परंतु नुकसान भरपाई त्यांच्या खात्यात आली आहे अश्या खोट्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करून दिलेल्या रकमा परत घ्या.
५) पात्र लाभार्थ्यांना तात्काळ मदत निधी देण्यात यावा
६)कृषी पंपांना ५०% वीज बिल माफ करा.
७)टपरीधारक व्यावसायिकांना वीणानिकष नुकसान भरपाई द्या. 

वरील मागण्या संदर्भात 
 १४ ऑगस्ट पासून उपविभागीय कार्यालयासमोर वंचित बहुजन युवक आघाडी आमरण उपोषण करनार असा इशारा वंचित बहुजन युवा आघाडीने दिला त्यावेळी, युवक जिल्हा महासचिव प्रकाश भिसे, ता उपाध्यक्ष सुनिल बोदडे, कृ.उ.बा.समिती संचालक प्रशांत अवसरमोल, सामजिक कार्यकर्ते अनिल भोपडे, गुलाबराव आठवले आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments