*शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार ) व शिवसेना (उ. बा. ठा ) पक्षाचे कृषि अधिकारी कार्यालयावर हल्लाबोल.*
दिनांक 12/8/2024 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार ) पक्षाचे नेते प्रसेनजीत पाटिल तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे नेते दत्तात्रय पाटिल यांनी कृषि अधिकारी जळगाव जामोद यांना घेराव घालून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या मागण्या त्वरित सोडवाव्या अन्यथा 16/8/2024 रोजी आंदोलनाचा ईशारा देण्यात आला होता.
सोयाबीन, कापूस हेक्टरी 5000 अनुदानातुन वंचित ठेवलेले शेतकरी, मागील वर्षीचा मंजूर झालेला पिकविमा तसेच पंतप्रधान शेतकरी सन्मान योजने मध्ये शेतकऱ्यांना होत असलेल्या नाहक त्रासा संदर्भात आज 16/8/2024 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या वतीने कृषि अधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. शिवसेना नेते दत्तात्रय पाटिल, शिवसेना तालुकाध्यक्ष गजानन वाघ,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रमोद सपकाळ यांनी कृषि अधिकारी यांना धारेवर धरले व दिलेल्या वेळेत मागण्यासंदर्भात काय कार्यवाही केली याचा जाब विचारला. सोयाबीन, कापूस अनुदाना पासून वंचित शेतकऱ्यांच्या तक्रारी स्वीकारणे चालू केले असुन येत्या 3-4 दिवसांत वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची नवीन सुधारीत यादी प्रसारीत होणार तसेच मागच्या वर्षीच्या मंजूर पिकविम्याच्या याद्या आज संध्याकाळ पर्यंत देणार असल्याचे कृषि अधिकारी यांच्या वतीने सांगण्यात आले.
जवळपास 70% मागण्या मान्य झाल्या असुन सर्व मागण्या निकाली निघे पर्यंत पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याचे राष्ट्रवादी व शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले.
यावेळी दत्तात्रय पाटिल, गजानन वाघ, प्रमोद सपकाळ, ईरफान खान, तुकाराम काळपांडे, भीमराव पाटिल,शेख जावेद, रमेश ताडे,बंडू पाटिल,संजय ढगे, आशिष वायझोडे,पुंडलीक पाटिल,अजहर पटेल, सुभाष रा. कोकाटे, अनंता वाघ, दत्ता डिवरे,राम पारस्कर,नितीन पाटिल, संकेत रहाटे, पवन वाघ, विशाल ताकोते,वामन गुडेकर, सुभाष तु. कोकाटे,सुहास वाघ, स्वप्नील आटोळे, दादाराव धंदर,पंजाब वाघ,अरविंद वायझोडे, विशाल वाघ यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व शेकडो शेतकरी उपस्थित होते.
0 Comments