*समाधान दामधर यांच्या नेतृत्वातील काँगेस च्या आंदोलनाला यश*
*गारपीट, अवकाळी पाऊस व वादळी वारे मुळे झालेल्या पिक नुकसान ग्रस्त लाभार्थी शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध*
*समाधान दामधर यांनी सर्व प्रसिद्धी माध्यम व पत्रकारांचे मानले आभार*
जळगाव जामोद तालुक्यातील जामोद व सुनगाव मंडळातील अवकाळी पाऊस व गारपीट मुळे नुकसान झालेल्या शेतकरयांना नुकसाभरपाईची यादी तहसील कार्यालय मार्फत प्रसिध्द करण्यात आली आहे.
जिल्हा कार्याध्यक्ष समाधान दामधर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी विभाग व तालुका, शहर काँग्रेस कमिटी जळगाव जामोद यांचे वतीने जळगाव जामोद तालुक्यात गारपीट, अवकाळी पाऊस व वादळी वारे झालेल्या पिक नुकसान ग्रस्त पंचनामा झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांची यादी तात्काळ प्रदर्शित करून भरपाई ची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे बाबत तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना निवेदन व आंदोलन कऱण्यात आले होते.
जळगाव जामोद तालुक्या मध्ये २०२३-२४ मध्ये झालेल्या वादळी वारेसह अवकाळी पाउस व गारपीट मुळे तालुक्यातील रब्बी शेत पिकांचे अतोनात नुकसान झालेले होते, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस च्या वतीने केलेल्या पाठपुराव्या नंतर, सदर पिक नुकसानीचे पंचनामे केलेले होते. जळगाव जामोद तालुक्यातील विविध मंडळातील मुखत्वे जामोद व सुनगाव मंडळातील ७,००० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे झालेले होते
*सदर याद्या प्रदर्शित न झाल्यास व तहसिल कार्यालयाच्या दिरंगाई मुळे एक ही शेतकरी मदती पासुन वंचित राहिल्यास उपोषण व लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा परखड इशारा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी विभाग चे जिल्हा कार्याध्यक्ष समाधान दामधर यांनी दिला होता*
महाराष्ट्र शासनाने अवकाळी पावसामुळे झालेल्या पिक नुकसानभरपाई बाबत घोषणा केलेली आहे. सदर पिक नुकसानीची रक्कम प्राप्त करण्या करिता शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे, शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्यासाठी तहसील कार्यालयाद्वारे प्रदर्शित केलेल्या यादी मधील क्रमांक भरणे आवश्यक असते.
परंतु जळगांव जामोद तहसिल कार्यालयाने अजून पर्यंत सदर लाभार्थी शेतकऱ्यांची यादी प्रदर्शित केलेली नव्हती, परिणामी तालुक्यातील शेतकरी शासनाने घोषित केलेल्या त्यांच्या हक्काच्या मदती पासुन वंचित राहन्याची शक्यता होती.
तरी तहसिल कार्यालाया मार्फत तात्काळ सदर शेतकऱ्यांची यादी प्रदर्शित करावी व शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई ची रक्कम जमा करावी, अन्यथा शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानास पूर्णपणे तहसिल कार्यालय व तहसीलदार म्हणून आपण जबाबदार असाल व एक ही शेतकरी मदती पासुन वंचित राहिल्यास उपोषण व लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल व प्रशासन म्हणून याची पूर्ण जबाबदारी आपली राहिल असे निवेदनात नमुद होते.
सदर नुकसानभरपाई च्या याद्या मिळताच शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला असून समाधान दामधर व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे शेतकऱ्यांनी कौतुक केले आहे.
यावेळी समाधान दामधर यांनी सर्व शेतकरी, काँगेस चे सहकारी व पत्रकार व प्रसिद्धी मध्यमांचे आभार मानले.
0 Comments