*शेतकऱ्यांची उभी पिके नष्ट होण्याच्या मार्गावर... वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करा सुनगांव येथील शेतकऱ्यांची मागणी...*
जळगाव जामोद प्रतिनिधी-
जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव शेत शिवारात येत असलेल्या वावडी हरदो येथील शेतकऱ्यांची केळी, संत्रा, कपाशी, सोयाबीन, तुरीची उभी पिके वन्यप्राणी नष्ट करीत असून या शेत शिवारामध्ये रानटी डुकरे, हरणे, मोठ्या प्रमाणात असून शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात जाऊन पिके नष्ट करीत आहेत त्यामुळे येथील नागरिकांनी त्रस्त होऊन जळगाव जामोद वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय गाठून वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करा यासह शेतकऱ्यांना सोलर फेंसिंग कंपाऊंड चा लाभ देण्यात यावा याकरिता आज दिनांक १२ सप्टेंबर रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश काळे यांना अर्जाद्वारे विनंती केली. तसेच यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश काळे यांनी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे ताबडतोब करण्याचे आश्वासन दिले व शासनाकडून मंजुरात लवकर मिळाल्यास सुनगाव येथील शेतकऱ्यांना सोलर फेंसिंग कंपाऊंड देण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी सुनगाव येथील वावडी हरदो शेत शिवारातील शेतकरी महादेवराव धुर्डे, रामेश्वर अंबडकार, मंगेश धुर्डे, रमेश वंडाळे, रमेश ढगे, अमोल तायडे, हरी हागे, बळीराम धुळे,विजय दामधर, संतोष काटोले, प्रेमसिंग पवार, अनिल मिसाळ, मोतीराम राऊत,पुंजाजी भोपळे, प्रविण मिसाळ, उखर्डा मिसाळ, योगेश मिसाळ, विजय गवई, मोतीराम राऊत, गणेश दामधर, ज्ञानेश्वर धुळे यांच्यासह बहुसंख्य शेतकरी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय येथे उपस्थित होते..
0 Comments