शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामाने त्या जवानावर अंत्यसंस्कार
घेऊन पांघरून तिरंग्याचे, गाढ झोपी गेलास तू देऊनी जबाबदारी आम्हाला, चिंतामुक्त झालास तू
(मोताला तालुक्यातील पिंप्री गवळी येथील रहिवाशी व सध्या राजस्थान येथे सैन्य दलात कार्यरत लॉन्स नायक भीमराव पुंडलिक नरवाडे या जवानाचा दि.२० एप्रिल रोजी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
झाला होता. आज सकाळी नऊ वाजता त्यांचे पार्थिव गावी पिंप्री गवळी येथे आणण्यात आले. तेव्हा त्यांची पत्नी व त्यांच्या आई-वडिलांनी एकाच हंबरडा फोडला ज्या वडिलांच्या शेवयात्रेत मुलांला सहभागी व्हायचं असते त्याच मुलाच्या शवयात्रेत आई-वडिलांना जावे लागणे हे सर्वात मोठे दुःख असते हेच दृश्य बघता उपस्थित असलेल्या लोकांच्या डोळ्यातही अश्रूंनी वाट मोकळी करून दिली त्यांचे पार्थिव ट्रॅक्टर टॉलीत ठेवण्यात आले. त्या शेजारी आई वडील, पत्नी, सात वर्षीय मुलगा व पाच वर्षीय मुलगी बसले होते यावेळी वीर जवान अमर रहे, भारत माता की जय या घोषणेसह ए मेरे वतन के लोगो, हर करम अपना करेंगे ए वतन तेरे लिए, कर चले हम फिदा जान वतन साथियो
या देशभक्तीच्या गीतासह हजारो महिला व पुरुषांच्या संगतीने संपूर्ण
गावातून मिरवणूक काढण्यात आले. अंत्यविधी स्थळी पार्थिव ठेवल्यानंतर मोताळा तहसीलदार, धामणगाव बढे पोलीस स्टेशन ते ठाणेदार तसेच त्यांचे सहकारी, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, जिल्हा सैनिक अधिकारी काही आजी-माजी सैनिक यांनी वीर जवान भीमराव नरवाडे यांना पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली. तसेच पोलीस प्रशासन व सैनिक दलाच्यावतीने त्यांना मानवंदना देण्यात आली नंतर. बौद्ध समाजाच्या
रितीरिवादानुसार विधी पूजन करण्यात आले शेवटी त्यांचा राज नामक या सहा वर्षीय चिमुकल्याने आपला वडिलांना अग्नी देताच नातेवाईक महिलांच्या तोंडून एकच हंबरडा निघाला यावेळी वातावरण अतिशय भावनिक झाले होते. यावेळी प्रत्येकाच्या मनात एकच विचार येत होता घेऊन पांघरून तिरंग्याचे, गाढ झोपी गेलास तू देऊनी जबाबदारी आम्हाला, चिंतामुक्त झालास तू
0 Comments