निंबोरा येथील रहिवाशी नागरिकांच्या विविध समस्या बाबत किसान एकता महासंघ चे वतीने जिल्हा अधिकारी यांना निवेदन सादर,
किसान एकता महासंघ नवी दिल्ली चे बुलडाणा जिल्हा सचिव संतोष तीरेराव यांचे वतीने जिल्हा अधिकारी बुलडाणा यांना गट विकास अधिकारी पंचायत समिती जळगाव जा यांचे मार्फत दिनाक 29/4/2025 रोजी निवेदन सादर करण्यात आले निवेदनात ग्राम पंचायत निंबोरा येथील नवीन प्लॉट धारक हे गेल्या पंचवीस वर्षे पासून त्याच जागेवर राहत आहेत त्यांना ग्राम पंचायत स्तरावरील रस्ते,नाली बांधकाम सारख्या सोई सुविधा मिळत नाही, घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही घरकुल यादीतील अनियमितता तपासणे,माहिती अधिकार अंतर्गत माहिती तत्काळ पुरवणे, उटी येथील दलीत वस्ती सुधार योजना अंतर्गत गेल्या वीस वर्षांपासून आज पर्यंत प्राप्त निधी व खर्चाबाबत अंदाज पत्रकसह माहिती द्यावी, पंतप्रधान आवास योजनेच्या लाार्थ्यांची यादी प्रमाणे स्थळ पंचनामा करून योग्य ती कारवाई करावी ,नीभोरा येथील गरजू लाभार्थी यांना घरकुलाचे यादीतील वगळण्यात आलेल्या त्यांना लाभ तत्काळ द्यावा,तसेच ग्राम सेवक हे नागरिकांना उद्धट वागणूक देतात व मंत्र्याची धमकी देत असल्याने कोणत्या मंत्र्याचा हात यांचे शिरावर आहे याची चौकशी करावी,ग्रामसेवक हे सहकारीसह लोकांना घरकुल मंजूर करण्याकरिता पैश्याची मागणी करत असल्याचंही आरोप निवेदनातून करण्यात आला,व मागितलेली माहिती तत्काळ पुरवणे व प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी व न्याय देण्यात यावा अन्यथा 11 मे रोजी पाणचट समिती कार्यालय समोर आमरण उपोषणाचा इशारा निवेदनातून देण्यात आला
निवेदनावर संतोष तीरेराव, ऍड,शिरीष मारोडे,संजय काकड,श्यामराव मुळे,भूपेंद्रसिग चव्हाण,विजयसिंह सोळंके,शमीम देशमुख,महादेव हरमकर,सौ,सरला ससाणे राजेंद्र ससाणे यांच्या सह्या असून निवेदनाच्या प्रती प्रतापराव जाधव केंद्रीय मंत्री भारत सरकार, मा,गिरीश महाजन ग्रामीण विकास मंत्री महाराष्ट्र राज्य,देवेंद्र प्रतापसिंह सोमवंशी राष्ट्रीय सचिव किसान एकता महासंघ नवी दिल्ली चे यांना देण्यात आल्या,
अहिल्या न्यूज चॅनल करिता कार्यकारी संपादिका सौ सरला ताई राजेंद्र ससाणे
जळगाव जा/ बुलडाणा
0 Comments