Advertisement

जळगाव जामोद तालुक्यात वादळी वारे व अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानी ची शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट मदत मिळणे बाबत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे निवेदन

जळगाव जामोद तालुक्यात वादळी वारे व अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानी ची शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट मदत मिळणे बाबत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे निवेदन

आज दिनांक 19 मे 2025 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी विभागच्या वतीने जामोद तालुक्यात वादळी वारे व अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानी ची शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट मदत मिळणे बाबत तहसीलदार व तहसीलदार यांचे मार्फत कृषि मंत्री यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात नमुद आहे की,

जळगाव जामोद तालुक्यात मे २०२५ मध्ये झालेल्या वादळी वारे व अवकाळी पावसामुळे  तालुक्यातील जामोद, सुनगाव, रसलपूर, निमखेडी,  कुंवरदेव, उसरा बु, उसरा खु, चालठाणा खु, चालठाणा बु, सोनबर्डी, कहूपट्टा, वावडी हरदो,गोराळा, कौलखेड, तरोडा, खेल लोण, खेल शिवापूर, खेल वर्गे, खेल माळी, खेल पारस,वनुर,सजनपुरी, राजुरा बु, राजुरा खु, महमदपुर, ततारपुर, खामखेड, पिंपळगाव काळे, आसलगाव, वडशिंगी, मराखेड, व इतर गावांमध्ये पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे.
वादळी वारे व अवकाळी पावसामुळे केळी, संत्रा, भूईमुंग, कांदा, वांगी, टमाटर, मिर्ची, पान-पिंपरी, भाजीपाला व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. 
केळी च्या बागा जमीनदोस्त झालेल्या असून संत्रा चे झाडे कोलमडली आहेत तसेच संत्रा झाडावरील आंबिया बहाराची संत्रा फळे गळून पडली आहेत. 
 तरी कागदी घोडे न नाचवता जळगाव जामोद तालुक्यात वादळी वारे व अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानी ची शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट मदत मिळावी. 
तसेच सदर शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट मदत न मिळाल्यास उपोषण व लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, तरी जळगाव जामोद तालुक्यात वादळी वारे व सतत च्या पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानी ची शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट मदत मिळावी.
यावेळी मा. तहसिलदार यांनी तत्काळ पंचनामे करून घेण्याचे आश्वासन दिले.
तरी ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल त्यांनी तलाठी, कृषी सहाय्यक यांचेशी संपर्क करण्याचे आवाहन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी विभाग कार्याध्यक्ष समाधान दामधर यांनी केले आहे.

यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे बुलढाणा जिल्हा कार्यकारी अध्यक्ष प्रकाश पाटील, ओबीसी विभाग जिल्हा कार्याध्यक्ष समाधान दामधर , तालुकाध्यक्ष अविनाश उमरकर, शहराध्यक्ष अर्जुन घोलप, एम आसिफ इक्बाल, ऍड भालेराव, अमर पाचपोर, जुबेर पटेल, श्रीकृष केदार, अंबादास बाठे, अजय ताठे, अबुल जहीर, सुनिल जाधव, नवल गोगाकर, प्रमोद तितरे, अनिल इंगळे सुरेश वानखडे, सय्यद तौफिक, अय्याज अहमद, निलेश देशमुख,  गजानन सूर्यवंशी सह काँग्रेस कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments