19 एप्रिल हा राज्याचे माजी पशुसंवर्धन, दुग्धविकास व मस्य विकास मंत्री महादेवजी जानकर यांचा वाढदिवस त्यानिमित्त
...
मा. महादेवजी जानकर यांचा जन्म सातारा जिल्हय़ातील वाढे या गावी झाला असून ते मूळचे पळसावडे (ता. माण) या गावचे आहेत. जानकरसाहेब म्हणजे चळवळीतून पुढे आलेले नेतृत्व. फुले-शाहू-आंबेडकरांच्या चळवळीतून त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात केली आहे. धनगर समाजामध्ये फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार रुजविण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
जानेवारी 1990 मध्ये बी. के. कोकरेंची यशवंत सेना पंढरपूरच्या चंद्रभागेत बुडविल्यानंतर यशवंत सेनेची धुरा जानकर साहेबांच्या खांद्यावर आली. आणि त्यांनी राज्यभरातील धनगरांच्या वाडीवस्तीवर फिरून, चटणी भाकरी खाऊन समाजामध्ये जनजागृती केली. आणि प्रसंगी मेंढरं विका; पण मुलाला उच्च शिक्षण देवून लोकशाहीच्या चार स्तंभातील आपली भागीदारी वाढवा, असे सांगून समाजाला शहाणे करण्याचा प्रयत्न केले. तसेच दरवर्षी 31 मे रोजी चौंडी येथे अहिल्याबाई होळकर जयंती साजरी करण्याची ऐतिहासिक परंपरा त्यांनीच सुरू केली. दुस-याच्या महालापेक्षा स्वत:ची झोपडी बरी, या विचारातून त्यांनी 2003 मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना करून समाजाला राजकीय व्यासपीठ मिळवून दिले. लोकसभेच्या रणांगणात उतरून नांदेड, सांगली व माढासह बारामती या राज्यातील बडय़ा सत्ता केंद्रांना मोठे धक्के दिले.
जानकर साहेबांच्या राजकीय कारकीर्दीच्या चढत्या आलेखाला अशीच अशीच भरारी मिळावी आणि देशभरातील धनगर, बहुजन ओबीसींचे नेतृत्व करण्यासाठी उदंड आयुष्य लाभो, ईश्वरचरणी हीच प्रार्थना..!!!
*शिवदास ऊर्खडा सोनोने*
रासप जिल्हा उपाध्यक्ष बुलढाणा व अहिल्या न्यूज-24 संपादक
0 Comments