जळगांव जा.प्रतिनिधी:-
दिनांक 28 ऑगस्ट पासून उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर अन्न त्याग आंदोलन चालू होते. आंदोलन कर्ते हे उपोषण मंडपातून दिनांक 30 ऑगस्ट च्या रात्री लघवी चे कारण देऊन मंडपातून पळून गेले होते. आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत असलेले पोलीस नाईक शांतीलाल धीरबस्सी व पोलीस कॉन्स्टेबल निवृत्ती झाल्टे या दोघांना कोणतीही चूक नसताना पोलीस अधीक्षक सुनील कडसणे यांनी अन्नत्याग आंदोलन प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित केले होते. या दोन पोलीस कर्मचाऱ्यांची कोणतीही चुकी नसताना त्यांच्या विरोधात केलेली निलंबनाची कारवाई चुकीची असून कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगाव जामोद शहर अध्यक्ष नागेश भटकर निवेदन दिले होते. तसेच अन्न त्याग आंदोलन करत्याला वास्तविक कोणीही पळुन नेले नव्हते हे वास्तव त्यांनी व्हायरल केलेल्या व्हिडिओ वरून सिद्ध झाले होते. यासह या दोन पोलीस कर्मचाऱ्या प्रति जनमानसात असलेली स्वच्छ प्रतिमा या सर्व गोष्टींचा विचार करून पोलीस अधीक्षक सुनील कळसणे यांनी या दोन पोलीस कर्मचाऱ्यांन वरील निलंबनाची कारवाई मागे घेतली असून त्यांना पुन्हा पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे कर्तव्यावर हजर होण्याच्या सूचना दिल्या आहेत.
0 Comments