सातपुडा शिक्षण संस्था संचालित तथा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे कृषी व उद्यानविद्या महाविद्यालय जळगाव जामोद येथील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी व उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत ग्राम ईलोरा येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना रब्बी व खरीप पिकाची सद्यस्थिती बघता त्यावर मार्गदर्शन करणे होता यामध्ये बियांण्याची बीज प्रक्रिया करण्यापासून ते पीक शेतकऱ्यांच्या घरांमध्ये येईपर्यंत घेण्यात येणारी काळजी तसेच यामध्ये रासायनिक खतांचा अतिवापर व त्यामुळे होणारे दुष्परिणाम ह्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. योगेश गवई लाभले. कार्यक्रमांतर्गत प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले श्री.शशांक दाते, कृषी विज्ञान केंद्र, जळगाव जा. यांनी शेतकऱ्यांना रब्बी तसेच खरीप पिकांचे व्यवस्थापन व माती परीक्षण याबद्दल माहिती दिली तसेच उद्यानविद्या महाविद्यालय जळगाव जामोद येथील प्राचार्य डॉ. विशाल तायडे यांनी शेतकऱ्यांना पिकांचा अवस्थेनुसार योग्य नियोजन कसे करावे, भाजीपाला व फळे पिकांची लागवड पद्धती व महत्त्व आणि शेतीपूरक उद्योग धंदे याबद्दल शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले. तसेच अध्यक्षीय संबोधन करताना प्राचार्य गवई यांनी ग्रामीण कृषी व उद्यानविद्या कार्यानुभव उपक्रम तसेच जमिनीचे आरोग्य व माती परीक्षण करण्याचे आव्हाहन केले. या कार्यक्रमा दरम्यान ग्राम ईलोरा गावचे पोलीस पाटील राजेंद्र तिजारे चावरा गावचे पोलीस पाटील गोविंदा लाथे तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता कृषी महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अविनाश आटोळे व उद्यानविद्या महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रितेश वानखडे यांचे सहकार्य लाभले. तसेच कृषी व उद्यानविद्या महाविद्यालयाच्या अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांनी उत्तम रित्या कार्यक्रमाची मांडणी केली.
0 Comments