Advertisement

छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या संरक्षण भिंतीची उंची वाढवने मनसे.मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या संरक्षण भिंतीची उंची वाढवने मनसे.
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूर:-चाळीस बिघा परिसरातील असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या सरंक्षण भिंतीची उंची वाढवने बाबत मनसे तालुका अध्यक्ष पंकज पाटील यांनी मुख्याधिकारी नगरपरिषद मलकापूर यांना एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
       चाळीस बिघा परिसरातील असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या सरंक्षण भिंतीची उंची वाढवने अंत्यत गरजेचे झाले असून सदर भिंत ही रस्त्यापासून केवळ दोन ते अडीच फूट उंच आहे त्यामुळे या भिंतीवरून सहज लहान मुलांना देखील उडी मारून बगिच्यात प्रवेश करता येतो. उद्यान सुरू व बंद होण्याच्या वेळे व्यतिरिक्त मागील काही दिवसांपासून या परिसरात प्रेमी युगलांची  दुपारच्या सामसूम वेळेला बगीच्या च्या मागील बाजू कडून प्रवेश करून अश्लिल चाळे सुरू असतात,त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या विशेष करून महिलांना या बाबीचा  नाहक त्रास सहन करावा लागतो आहे,परंतु ह्या बाबींना कुठे तरी थांबायला हवे या करिता परिसरातील काही नागरिकांनी मागील आठवड्यात प्रेमी युगलांचे अश्लील चाळे सुरू असताना दामिनी पथकाला फोन करून बोलवून घेतले, त्या प्रमाणे दामिनी पथकाने कारवाही सुद्धा केली परंतु ही समस्या कायमस्वरूपी मिटावी या करिता उद्यणाच्या संरक्षण भिंतीची उंची वाढवने अत्यावश्यक झाले आहे कारण या उद्यणाला दोन गेट असून एक पश्चिम दिशेला आहे ते गेट उद्यान उघडण्याच्या वेळेत उघडते व दुसरे गेट हे दक्षिण दिशेला आहे ते गेट फक्त उद्यणात राहणाऱ्या वॉचमन साठी असुन यातून प्रवेश दिला जात नाही.तरी गंभीर बाबी कडे लवकरात लवकर लक्ष देऊन या भिंतीची उंची वाढविण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली असून या निवेदनावर मनसे तालुका अध्यक्ष पंकज पाटील,मनवीसे तालुका अध्यक्ष गणेश जैस्वाल,मनवीसे शहर अध्यक्ष निखिल पोंदे,विठ्ठल चंदनशिव,भूषण सुरंगे,रितेश भोपडे,गजराज साळुंके,नितीन कदम,यांचे सह मनसे सैनिकांच्या सह्या आहेत.उद्यानाच्या सरंक्षण,साफसफाई तसेच वृक्षांच्या देखभालीची जबाबदारी ही डॉक्टरांच्या आय.एम.ए या  संघटनेने घेतली आहे तसा करारही नगरपरिषदे सोबत झालेला आहे.परंतु उद्यानात साफसफाईची उणीव भासत असून याचा त्रास फिरण्यासाठी येणाऱ्या नागरीकांना सहन करावा लागत आहेत.पावसाळ्याच्या पाण्या मुळे तलावाचे स्वरूप उद्यानाला आले होते त्या मुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून नियमित योगा करणाऱ्या नागरिकांना देखील याचा खूप त्रास होतो या पाण्याचा कायमस्वरूपी रेनवॉटर हार्वेस्टिंग करून बंदोबस्त करावा.

Post a Comment

0 Comments