कृषी विद्यार्थिनीनी शेतक यांना दिली बीज
प्रक्रियेबद्दल प्रात्यक्षिकाद्वारे महिती
प्रतिनिधी जळगाव जा
डॉ. पंजाबराव देशमुख स्वा. वि. ग. इंगळे कृषी विद्यापीठ अंतर्गत स्वा. महादियालयाच्या कृषि कन्यानी तालुक्यातील ग्राम उटी (बु.) येथे भेट देऊन बीजप्रक्रिये बदल माहिती दिली, आता रबी हंगामाला सुरूवात झाली आहे. हरभरा, गहू, भुईमुग, ही पिके प्रमुख्यानी घेतली जातात. या बियान्यांची बीज प्रक्रिया करणे महत्वाचे असते. पिकांवर येणारे रोग जे जमिनीच्या माध्यमातून बियाण्यावर होतात . अश्या रोगांपासून तसेच किडी पासून बियाचे संरक्षण करण्यासाठी बिज प्रक्रिया महत्वाची असते . बिज प्रक्रिये मुळे जास्ती फवारणी चा खर्च कमी होते. बिज प्रक्रिया केल्यास निरोगी वाढ होते व उत्पादन वाढते. त्यामुळे बिज प्रक्रिया ही पेरणी पूर्वी महत्वाची असते असे सांगण्यात आले. यावेळी महाविद्यालया चे प्राचार्य श्री.योगेश गवई ,कार्यक्रम अधिकारी श्री.अविनाश आटोळे, कार्यक्रम समन्वयक विद्या कपले ,विषयतज्ञ प्रा. प्रमोद ढवळे प्रा. विद्या कापले आदी यांच्या मार्गदर्शनाखली बीज प्रक्रिया आयोजित करण्यात आली.
या वेळी गट प्रमुख अनुजा आढे व ईतर कृषी कन्या अंकिता अंबडकार , स्मृती बोचे , आकांक्षा बोदडे , मनीचंदना , प्रगणा , या कृषी कन्याचा सहभाग आहे.
0 Comments