Advertisement

जामोद शिवारातील शेतकऱ्यांच्या जमिनीची जिरायती ऐवजी बागायती अशी नोंद करण्यात यावी जामोद ग्रामपंचायतचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जामोद शिवारातील शेतकऱ्यांच्या जमिनीची जिरायती ऐवजी बागायती अशी नोंद करण्यात यावी
 जामोद ग्रामपंचायतचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 
प्रतिनिधी जळगाव जामोद 
जळगांव(जामोद):दि.८ ग्राम पंचायत जामोद अंतर्गत येणाऱ्या खेल शिवापूर, खेल लोण, खेल वर्गे, खेल माळी, खेल पारस शिवारातील बागायती असलेल्या परंतु ७/१२ उताऱ्यावर जिरायती असा उल्लेख असलेल्या शेत जमिनीची ७/१२ उताऱ्यावर जिरायतीम्हणून नोंद आहे. प्रत्यक्षात ह्या जमिनी बागायती आहे ह्या शिवारामध्ये मुबलक पाण्याची व्यवस्था असल्याने बारामती बागायत तिथे केले जाते सातबारावर जिरायती नोंद असल्याने कोणताही शासकीय मोबदला मिळताना शेतकऱ्याचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होते जमीन विक्री करताना सुद्धा फार नुकसान होते
ह्या,शिवारातील शेतकरी २५ वर्षांपेक्षाअधिक काळापासून बारामाही बागायती शेती करीत आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर विहीर / बोअर ची नोंद असुन, बारमाही व बहुवार्षिक बागायती पिकांचा पिक पेरा नमूद आहे सदर शेतकऱ्यांची बागायती असलेल्या शेतजामीन चा ७/१२ उताऱ्यावर जिरायती असा उल्लेख असल्याने शेतकऱ्यांना बँक कर्ज घेते वेळी कर्ज रक्कम कमी मंजूर होत आहे तसेच पिक विमा व विविध पिक नुकसान व शेत नुकसान भरपाई ची रक्कम पण कमी मिळत आहे. विविध सार्वजनिक उपक्रमांसाठी जामीन अधिग्रहण करते वेळी सदर जमिनीचा ७/१२ उताऱ्यावर जिरायती असा उल्लेख असल्याने शेतकऱ्यांना आपल्या बागायती शेतीकरिता जिरायती शेतीच्या भावात मोबदला मिळाल्यास शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होऊ शकते.तसेच बागायत जमिनींवर रोजगार हमी उपकर व शिक्षण उपकर वसूल केला जातो व तो शेतसाऱ्यासोबतच वसूल केला जातो, परंतु सदर बागायती जमिनींची ७/१२ उताऱ्यावर जिरायती असा उल्लेख असल्याने शासनाचा महसूल पण बुडत आहे. तरी ह्या सर्व जमिनीची जिरायती म्हणून असलेली नोंद रद्द करून सातबारावर बागायती नोंद करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन जामोद ग्रामपंचायतच्या वतीने दिनांक ८ डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले. सदर निवेदनावर ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंच सौ गंगुबाई दामधर ,उपसरपंच बशीर महंमद ,ग्राम विकास अधिकारी कैलास चव्हाण यांच्या स्वाक्षरी आहेत.
निवेदनकर्त्यांनी निवेदनात पुढे असेही नमूद केले आहे की, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मध्ये जिरायत किंवा बागायत जमिनींची स्पष्ट व्याख्या नमुद नाही.
म.ज.म.अ. मध्ये कलम ९० (ब) मध्ये 'जमिनीचा वर्ग' ची उदाहरणे म्हणुन वरकस, कोरडवाहू, भाताची जमीन व बागायत जमीन असे नमुद असुन या प्रकारांची व्याख्या नमुद नाही.
महाराष्ट्र जमीन महसूल (शेतजमिनीवरील जमीन महसुलाची आकारणी व जमाबंदी) नियम, १९७०, नियम १४ (२) (क) आणि (इ) (दोन) मध्येही (१) कोरडवाहू (२) भाताची (३) बागायत आणि (४) वरकस असे वर्गीकरण नमुद असुन मुख्य पिकांचे उत्पन्न लक्षात घेऊन उत्तम, मध्यम व हलकी अशा उपवर्गामध्ये वर्गीकरण केलेले आहे तथापि, स्पष्ट व्याख्या नमुद नाही.
त्यामुळे अन्य माध्यमे, कायदे, लेख येथुन संदर्भ घेऊन (१) कोरडवाहू /जिरायती (२) भाताची (३) बागायत आणि (४) वरकस जमिनींची व्याख्या खालीलप्रमाणे करता येईल.

तरी सात-बारा सदरी जिरायत क्षेत्र नमुद असले आणि प्रत्यक्षात अशा शेतजमिनीमध्ये पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असेल आणि संबंधीत शेतकरी किमान तीन वर्ष सलगपणे बागायत पीके घेत असेल तर, शेतकऱ्याच्या अर्जावरून, जबाब, पंचनामा व अन्य पुरावे यांच्या आधारे आणि उपअधिक्षक, भूमी अभिलेख यांच्या सल्ल्याने, आदेशान्वये, अशा शेतजमिनीचे जिरायत क्षेत्र बागायत क्षेत्रात रूपांतरीत करणे आवश्यक आहे.
तरी आवश्यक ती कार्यवाही करून ग्राम पंचायत जामोद अंतर्गत येत असलेल्या ज्या शेतजमिनीमध्ये पाण्याचा स्त्रोत उपलब्ध आहे आणि संबंधीत शेतकरी किमान तीन वर्ष सलगपणे बागायत पीके घेत आहे अश्या सर्व शेत जमिनींची ७/१२ उताऱ्यावर बागायती अशी नोंद करण्यात यावी अशी मागणी वजा विनंती सरपंच उपसरपंच सचिवांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे ग्रामपंचायतचे हे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देतेवेळी सरपंच उपसरपंच सदस्यांचे ग्रामस्थांची सुद्धा उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments