महाराजा यशवंतराव होळकर यांचा जन्म ३ डिसेंबर या दिवशी १७७६ ला पुणे जिल्ह्यात वाफगाव च्या भुईकोट किल्ल्यात झाला

.महाराजा यशवंतराव होळकर मराठेशाहीतील अखेरचे कर्तबगार महाराजा होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर वैदिक पद्धतीने राज्यभिषेक करणारे एकमेव होते .महाराजा यशवंतराव होळकर यांच्यावर स्वकीय म्हणजे पेशव्यांनी केलेल्या अगणिक अन्याय विरोधात लढावे लागले .पेशव्यांनी अर्धीअधिक होळकर रियासत जप्त केली होती .येशवंतरावांचा मोठा भाऊ मल्हारराव (दुसरे) यांचा खून केला आणि त्यानंतर राजे विठोजीराव होळकर यांना पेशव्यांनी शनिवार वाड्यासमोर हत्तीच्या पायाखाली चिरडून मारले दोन दिवस राजे विठोजीराव यांचा देह शनिवार वाड्यासमोर तसाच ठेवला होता ..एवढा मोठा क्रूर अत्याचार पेशव्यांनी केला होता ..पण महाराजा येशवंतराव होळकर यांनी पुण्याचा हडपसरला पेशवे आणी शिंदे यांच्या सैन्याचा पराभव केला .त्यानंतर दुसरा बाजीराव पर्वती येथे पळून गेला म्हणून इतिहासात त्याला पळपुटा बाजीराव म्हणतात ..त्यानंतर बाजीरावाने येशवंतरावांच्या भीतीने इंग्रजांशी करार करून तैनाती धोरण स्वीकारून मराठा साम्राज्य इंग्रजांच्या घश्यात घातलं .पेशव्यांना महाराजा येशवंतराव होळकर यांच्या पराक्रमाचा ताकतीचा चातुर्याचा उपयोग मराठी साम्राज्य वाढवण्यासाठी करता आला नाही हे मोठं दुर्दैव आहे .हडपसरच्या युद्धात पेशव्याच्या सैन्याचा खच पडला होता रक्ताचे पाट वाहत होते .म्हणून त्या युद्धभूमीचे नावं 'हडपसर 'असे पडले .असं म्हणतात की ,इंग्रजांच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता .म्हणजे जगभर पसरलेला बलाढ्य इंग्रजी साम्राज्य ज्या इंग्रजांनी नेपोलियन ला हरवले अश्या अजिंक्य असलेल्या इंग्रजी सैन्य ज्या ज्या वेळेस महाराजा येशवंतराव होळकर यांच्या समोर रणांगणात त्या त्या वेळेस इंग्रज पराभूत झाले येशवंतराव होळकरांनी तब्बल सलग अठरा वेळेला इंग्रजांच्या पराभव केला .भीषण कत्तली केल्या तब्बल ३०० इंग्रज सैन्याचे नाक तलवारीने कापले होते .इंग्रजांच्या सोबत लढाया झाल्या त्यात सलग अठरा वेळा आयुष्यात एकदाही हरले नाहीत .असे महाराजा येशवंतराव होळकर महापराक्रमी भारतातील जातीय इतिहासात दुर्लक्षित राहिले हे मराठेशाहीचे होळकरशाहीचे दुर्दैव आहे .महाराजा येशवंराव होळकर यांच्या नवीन सापडलेल्या पत्रव्यवहारातून भारतातील बरेच राजे मराठा सरदार यांना एकाचवेळी इंग्रजांना देशातून बाहेर पळवून लावू असा उल्लेख सापडतो .पण तसे झालं नाही भारतातील संथानिक इंग्रजांना फितूर झाले .या महान महापराक्रमी सम्राट येशवंतराव होळकरांनी अवघ्या पस्तीस व्या वर्षी देह ठेवला ...त्यानंतर इंग्रजाविरीधातील स्वतंत्र लढा त्यांचा कन्या आद्य क्रांतिकारी भीमाबाई होळकर यांनी चालू ठेवला ....आज ६ जानेवारी या दिवशी महाराजा सम्राट येशवंराव होळकर यांचा राज्याभिषेक दिन मराठेशाहीतील होळकर राजघराण्यातील अखेरचा कर्तबगार योद्धा ..आमच्या महापराक्रमी राजास राज्याभिषेक दिनानिमित्त मानाचा त्रिवार मुजरा ...मानाचा त्रिवार मुजरा .🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐💐💐
शिवदास उखर्डा सोनोने अहिल्या न्युज 24 संपादक
0 Comments