Advertisement

अंत्यसंस्कारासाठी गोकाष्ठचा वापर करण्याचे आदेश.जय जिनेन्द्र फाउंडेशनच्या चळवळीची शासनाकडून दखल

अंत्यसंस्कारासाठी गोकाष्ठचा वापर करण्याचे आदेश.
जय जिनेन्द्र फाउंडेशनच्या चळवळीची शासनाकडून दखल
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
झाडांची होणारी बेसुमार कत्तल आणि पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यासाठी जय जिनेन्द्र फाउंडेशनने राबविलेल्या कल्याणकारी चळवळीची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. राज्य शासनाच्या नगरविकास खात्याने अंत्यसंस्कार व होळी सणासाठी गोकाष्ठचा वापर करण्याचे आदेश बजावले आहे. नगर प्रशासनाचे सह आयुक्त, आयुक्त आणि सर्व विभागीय आयुक्तांना हे निर्देश देण्यात आले आहे. हा फाउंडेशनच्या चळवळीचे मोठे यश म्हणावे लागेल. यापूर्वी फाउंडेशनने राज्यभरात लोकचळवळ उभारून जन जागृती केली. विविध कामांसाठी झाडांची कत्तली करून लाकुड तोडण्याचे प्रमाण वाढले. अंत्यविधी, होळीसाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करण्यात येत असल्याने पर्यावरण धोक्यात आले आहे. त्याऐवजी गौरक्षणाच्या माध्यमातून शेणावर प्रक्रिया करून तयार करण्यात येणाऱ्या लाकडाचा काष्ठचा) करावा, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली. जय जिनेन्द्र फौंडेशन संस्थेने राबवलेल्या मोहिमेची व मागणीची महाराष्ट्र शासनाने गंभीर दखल घेतली. नगर प्रशासन मंत्रालयाच्या सहायक आयुक्त सुवर्णा ओगले शिंदे यांनी या संदर्भात लेखी आदेश निर्गमित केले. त्यात गो काष्ठचा वापर करण्याचे व अधिकाऱ्यांनी यासाठी कार्यवाही
करण्याचे निर्देश दिले आहेत.
जय जिनेन्द्र फाउंडेशनच्या चळवळीची शासनाकडून दखल.
या पत्रात आयुक्तांनी नमूद केले आहे की, भारत सरकारने ग्रीन क्रेडिट प्रोग्राम अंमलबजावणी नियम २०२३ अंतर्गत कार्बन क्रेडिट संकल्पना सुरू केली आहे. अंतिम संस्कार आणि होळी यासाठी लाकडाऐवजी गोकाष्ठाचा वापर केल्यास कार्बनचे प्रमाण कमी होऊन पर्यावरण स्वच्छ राखण्यासाठी मदत होईल असे आढळून आले आहे. शिवाय झाडांची कत्तल कमी होईल.

स्वच्छ, सुंदर, हिरवेगार महाराष्ट्र ही संकल्पना यामुळे मूर्त स्वरूपात येईल. जय जिनेन्द्र फाउंडेशन या संस्थेने संपूर्ण महाराष्ट्रात गोकाष्ठाचा वापर करावा म्हणून चळवळ उभारली आहे. गोशाळेच्या क्लस्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर गोकाष्टाचे उत्पादन सुरू केले आहे. या गोकाष्ठामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हजारो झाडांची हानी थांबेल, कार्बन क्रेडिट संकल्पना राबविण्यासाठी मदत होईल.
चळवळ हेच माझे ध्येय जयजिनेन्द्र फाउंडेशनने संपूर्ण महाराष्ट्रात गोकाष्ठाची चळवळ राबविली. याची शासनाने दखल घेतली असल्याने याचा मोठा फायदा होणार आहे. वृक्ष तोड होणार नाही, अनेकांना रोजगार मिळेल तसेच प्रदक्षण नियंत्रण राहण्यासाठी मदत होईल. ही चळवळ अधिक व्यापक करणे हेच आपले ध्येय राहणार आहे.
 सुहास (बंडू) चवरे, माजी नगरसेवक, मलकापूर.या अनुषंगाने, आपल्या कार्यक्षेत्रातील नगर पालिकाज्ञव नगर पंचायतीमध्ये अशी संकल्पना राबविण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी.

Post a Comment

0 Comments